यवतमाळ जिल्ह्यात नव्याने होणाऱ्या २३०० सेतू केन्द्रासाठी अर्ज मुदतवाढीची मनसेची मागणी... जिल्हाधिकाऱ्यांनी दिले दोन दिवस मुदतवाढीचे आदेश-मनसेच्या मागणीला यश.
यवतमाळ : जिल्हयात नव्याने निर्माण होणाऱ्या गाव तिथे सेतु केंद्र मोहिम अंतर्गत २३०० सेतू केन्द्रासाठी अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी या मागणीसाठी मनसेच्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन मुदतवाढीची मागणी करण्यात आली. आज दि. १६ जून रोजी जिल्हाधिकारी यांचेकडे मनसेच्या पदाधिकार्यांनी केल्याने अर्ज करणाऱ्या अनेक गावातील बेरोजगारांना दिलासा मिळणार आहे . बेरोजगारीच्या जिल्ह्यातील प्रमाण आणि त्याचे गांभीर्य मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देत मुदतवाढ देणे गरजेचे असल्याचे मत याप्रसंगी मांडले. यावेळी मनसेच्या शिष्टमंडळासोबत जिल्ह्यातील अर्ज करण्यासाठी आलेले अनेक बेरोजगार सुद्धा उपस्थित होते.त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस मुदत वाढ करण्याची घोषणा मनसेच्या शिष्टमंडळात समक्ष केली.
यवतमाळ जिल्हा प्रशासनाने नागरिकांना गावात महसुलाच्या सेवा उपलब्ध व्हाव्या म्हणून गाव तिथे सेतू केंद्र उघडण्याची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात २३०० सेतू केंद्र उघडले जाणार आहे. सदर २३०० सेतु केंद्रासाठी शुक्रवारपर्यंत दोन हजार ६८ अर्ज दाखल करण्यात आले. आज सोमवारी १६ जून रोजी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे.
परंतु अर्ज भरण्यासाठी झालेली गर्दी, बेरोजगारीचे प्रमाण पाहता बरेच जण अर्ज करण्यापासून वंचित राहत आहेत. अर्ज करण्यासाठी लागणारे कागदपत्र जमा करण्यासाठी अर्जदारांचा खूप वेळ गेला आहे. सदर मोहिमे अंतर्गत बारावी पात्र उमेदवारांना यासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड ज्या जागी केंद्र उभे करणार त्या ठिकाणची टॅक्स पावती पावती बंधनकारक आहे. या सर्व अर्टीची अर्जदार पूर्तता करत असून अर्ज भरण्यासाठी आपल्या कार्यालयामध्ये झालेली गर्दी पाहता अनेकजण या शासनाच्या महत्वकांक्षी मोहिमेतून वंचित राहण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आज मनसे सोबत झालेल्या चर्चा दरम्यान जिल्हाधिकारी विकास मीना यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत सेतू केंद्र अर्ज साठी मुदतवाढ देण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून या संदर्भात मुदतवाढ देण्यात येईल अशा आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला दिले. यामुळे जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना दिलासा मिळणार असून मनसेच्या मागणीला यश आले आहे.
तरी उपरोक्त सर्व बाबींचा विचार करून आपण " गाव तिथे सेतू" यासाठी अर्ज करण्याची तारखेची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी निवेदनातून जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे, डेव्हीड शहाणे, सादिक शेख, शिवम नांदुरकर, सौरभ अनसिंगकर, सोनू गुप्ता, तुषार चोंडके, सचिन इंगोले, अमोल कवडे,मुकुंद जोशी आदि पदाधिकार्यांनी केली आहे .