सन्मान एका कृषी पूरक उद्योग निर्मिती करणाऱ्या कृषी उद्योजकाचा राजाभाऊ लुंगे यांना सन 2025 चा अत्यंत मानाचा कृषी पूरक उद्योग या संवर्गातून राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार प्रदान..
अमरावती : दिनांक 25 मे 2025 रोजी टाकरखेडा शंभू ,ता. भातुकली जि. अमरावती येथे आयोजित राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार सन्मान सोहळ्यात युवा उद्योजक राजाभाऊ लुंगे यांना प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय राजीव गांधी कृषि रत्न पुरस्कार बहाल करण्यात आला.
याप्रसंगी राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश साबळे, ग्रामगीताचार्य पौर्णिमाताई सवाई, संत गाडगेबाबा अध्यासनाचे प्रमुख डॉ.दिलीप काळे, जिजाऊ बँकेचे संचालक भैय्यासाहेब निचळ, आयडियल ऍग्रो सर्च कंपनीचे वैभव जाधव, राजीव गांधी प्रतिष्ठानचे सदस्य राहुल तायडे, दीपक पाटील, गोपाल कडू आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
राजाभाऊ लुंगे यांनी शहरातील होणारे प्रदूषण , रोगराई रोखण्यासाठी व स्वच्छते करिता शहरातील दररोज निघणारा सहा ते सात टन ओला नारळ, कचरा यावर प्रक्रिया करून कोकोपीट, नारळदोरी व विविध प्रकारच्या वस्तू बनवण्याचा कृषीपूरक उद्योग अमरावती एमआयडीसी क्षेत्रात सुरू केला व एक रोजगार क्षम व्यवसाय सुरू केला, ही बाब तरुण शेतकरी पुत्रांसाठी अत्यंत प्रेरणादायी असल्याचे मत प्रकाश साबळे यांनी यावेळी व्यक्त केली.
राजाभाऊ लुंगे यांना राज्यस्तरीय राजीव गांधी कृषिरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनचा सर्व स्तरातून वर्षाव होत आहे.