पशू पक्ष्यांसाठी कृत्रिम पाणवठे हर्षल रामेश्वर साबळे मित्र परिवाराचा स्तुत्य उपक्रम

 



मूर्तिजापूर - महाराष्ट्र राज्यातील विविध शहरांमधील तापमानात कमालीची वाढ होत आहे.याचा फटका जसा आपल्याला बसतोय तसा पक्ष्यांनाही बसत आहे.उन्हाच्या कडाक्यामुळे पक्ष्याचे प्राण जाऊ नये यासाठी हर्षल रामेश्वर साबळे मित्र परिवारपुढे सरसावले असून जुनी वस्ती मधील विविध भागात व प्रभाग क्रमांक ६ मध्ये जवळपास ५० पाणवठे त्यांनी जिथे घर व वृक्ष,तिथे पाणवठे हा उपक्रम दरवर्षी प्रमाणे सुरू केला आहे.

       वाढत्या उष्माघातामुळे पशू-पक्ष्यांना पाण्याची गरज भासू लागली आहे.अशा वेळी पशू-पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाणवठे तयार करून देणे गरजेचे आहे.हळूहळू उष्माघातात वाढ होत आहे.त्यामुळे वाढत्या उन्हाच्या झळा पशू-पक्ष्यांना असह्या होवू लागल्या आहेत.आपल्या आजूबाजूला असलेल्या पशू-पक्ष्यांना सोय व्हावी,अशा परिस्थितीत पक्ष्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.यासाठी पक्ष्यांना वाढत्या उन्हात तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी अरुण डांगे,राजू चौधरी,पंकज वानखडे,सुनील पाचडे,अभिजित गांजरे,सुकेश दुबे,प्रत्युष पाचडे,रोहित उपाध्याय,दिप साबळे,सार्थक साबळे,शुभम वानखडे,मंगेश दुबे आदी प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post