नेरपिंगळाई प्रतिनिधी/प्रमोद घाटे
नेरपिंगळाई : विदर्भातील आराध्य दैवत आणि महाराष्ट्रतिल पुर्ण शक्ती पिठा पैकी अधै शक्ती पीठ असलेल्या श्री पिंगळदेवी च्या गडावर दर्शनासाठी संपुर्ण महाराष्ट्रातुन लाखोंच्या संख्येने भक्त दर्शना ला येतात, परंतु काही वर्षापासून श्री गुरु गंगाधर स्वामी (गावातील मठ) नेरपिंगळाई पासून गडाकडे जाणाच्या सदाशिव बाग रस्त्याचे काम वनविभागाच्या परवानगी साठी अडून आहे. परिणामता रस्त्यावर टाकलेला मुरुम रस्ता संपूर्ण उखळला आहे पुर्वे कडून पश्चिते कडे जाणाऱ्या मुख्य गड रस्त्यावरुन भक्तांना मोटार सायकल व चारचाकी नेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोक प्रतिनिधींनी याकडे देऊन रस्त्याचे थांबलेले काम चैत्र मास अर्थात एप्रिल 2025 पर्यंत पुर्ण करावे अशी मागणी.
नेरेपिंगळाई ग्रामस्थांनी केली आहे. चैत्र महीन्यात नेरपिंगळाई गावातुन पहाटे भक्त पायदळ चालत गडावर दर्शनासाठी जातात रस्त्या सोबतच सोलर स्ट्रीट लाईट सुद्धा पिंगळा देवी गड़ा पर्यंत लावण्यात यावे अशी मागणी भक्तांनी केली आहे. नेरपिंगळाई ते बाग रस्त्याने पिंगळा देवी गडावर गेल्याने सुरवातिला भक्त श्री नागेश्वर महाराज यांचे समाधी मंदिराला नमन करून पवित्र आशा कापुर तलावात स्नान करून येथिल जल देविच्या चरणी तसेच शिव अर्पण करण्यासाठी लोटा भरून जल नेतात. दरवर्षी चैत्र तसेच अश्विन महिन्यात लाखो भाविक भक्तांना त्रास सहण करत जावे लागत आहे तरी सर्व संबंधित लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाच्या अधिका-यांनी लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष द्यावे अशी चर्चा सर्व गावकरी व भक्त करित आहे.