पोलीस महासंचालक,श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.




 पोलीस महासंचालक,श्रीमती रश्मी शुक्ला

यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

-----------------------------------------


लेखक श्री तानाजी सखाराम कांबळे. 

8080532937. 

---------------------------------------


राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांकडून वारंवार रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली जात होती. असं असतानाच आता रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी काँग्रेसने केली होती. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्या प्रकरणी गुन्हे दाखल होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्या बदलीची मागणी केली. शुक्ला यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी पटोले यांनी पत्र लिहित निवडणूक आयोगाला केली. शुक्ला या भाजपला मदत करणाऱ्या अधिकारी असल्याचा आरोप पटोलेंनी केला होता. संजय राऊत यांनी देखील रश्मी शुक्ला यांच्या बदलीची वारंवार मागणी केली होती. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत रश्मी शुक्ला यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत.


देशातील सर्वाधिक वादग्रस्त ठरलेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी,श्रीमती रश्मी शुक्ला तथा राज्य सरकारच्या

पहिल्या पोलीस महासंचालक सध्या राज्याच्या,राजकीय वर्तुळामध्ये,विविध कारणाने चर्चिल्या जात आहेत. 

त्यानिमित्ताने त्यांच्यावरती टाकलेला हा प्रकाश झोत. 


आयपीएस रश्मी शुक्ला यांचे नाव तेव्हा चर्चेत आले, जेव्हा त्यांचे नाव फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी म्हणून आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 मध्ये या संदर्भात शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या दोन एफआयआर रद्द केल्या होत्या. आयपीएस रश्मी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात.


राज्याच्या पहिल्या पोलीस महासंचालक

रश्मी शुक्ला यांना दोन वर्षांची मुदतवाढ मिळाली आहे. शुक्ला या जून २०२४ मध्ये निवृत्त होणार होत्या. आता त्यांना २०२६ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. 


शुक्ला यांनी आयपीएस अधिकारी रजनीश सेठ यांच्याकडून पोलीस महासंचालकपदाची सूत्रे हाती घेतली. शुक्ला यांची ४ जानेवारी २०२४ रोजी चार महिन्यांसाठी पोलीस महासंचालकपदासाठी नियुक्ती झाली.तत्पूर्वी त्या सशस्त्र सीमा बलात प्रतिनियुक्तीवर होत्या.त्यांच्याविरोधातील तीन गुन्हे मुंबई हायकोर्टाने रद्दबातल ठरवले.


एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या प्रकाश सिंग यांच्या निकालाचा हवाला देऊन राज्य पोलीस प्रमुखांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली. गृहमंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले की,पोलीस प्रमुखांना राजकीय दबाव येऊ नयेत,याची खात्री करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार, पोलीस अधिकारी निवृत्त झाला नसल्यास त्याला दोन वर्षांची मुदतवाढ देता येते, त्याचाही आधार घेतला आहे.


कोण आहेत?


IPS रश्मी शुक्ला 

-------------------------------------------


IPS रश्मी शुक्ला या देशाच्या गतिमान महिला अधिकारी म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्र पोलिसात डीजीपी होण्यापूर्वी आयपीएस रश्मी यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. 2020 मध्ये त्यांच्या एका पत्राने संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवून दिली होती.

त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया.


रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1965 रोजी मुंबई, महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंट झेवियर्स स्कूल, मुंबई येथून झाले. यानंतर त्यांनी प्रसिद्ध एल्फिन्स्टन महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली. रश्मी शुक्ला यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली आहे. रश्मी शुक्ला यांनी कॉलेजसह यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी केली. 1988 मध्ये त्यांनी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली. आयपीएस झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्र केडर मिळाले.


रश्मी शुक्ला 1988 मध्ये IPS म्हणून रुजू झाल्या आणि त्यांना महाराष्ट्र केडर देण्यात आले. त्यांनी महाराष्ट्र पोलिसांमध्ये औरंगाबाद ग्रामीण, नाशिक ग्रामीण, सातारा आणि पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक (एसपी) दक्षिण विभाग अशा विविध पदांवर काम केले आहे. याशिवाय त्यांची मुंबईच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त (एसीपी) पदावरही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी नागपूर आणि पुणे शहरात गुन्हे शाखेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.


IPS रश्मी शुक्ला यांनी केंद्र सरकारच्या आदेशानुसार दिल्ली आणि हैदराबादमध्ये केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) चे उपमहानिरीक्षक (DIG) आणि हैदराबादमध्ये CRPF चे अतिरिक्त महासंचालक (ADG) म्हणूनही काम केले आहे. त्यांचे लग्न आयपीएस अधिकारी उदय शंकर यांच्याशी झाले होते. IPS उदय शंकर यांचे 2018 साली निधन झाले.


आयपीएस रश्मी शुक्ला यांचे नाव तेव्हा चर्चेत आले, जेव्हा त्यांचे नाव फोन टॅपिंग प्रकरणात आरोपी म्हणून आले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सप्टेंबर 2023 मध्ये या संदर्भात शुक्ला यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या दोन एफआयआर रद्द केल्या होत्या. आयपीएस रश्मी या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या मानल्या जातात.


शुक्ला वादात कशा सापडल्या?


रश्मी शुक्ला यांनी फोन टॅपिंगच्या मदतीने पोलीस अधिकाऱ्यांची पोस्टिंग आणि बदलीत भ्रष्टाचार झाल्याचा रिपोर्ट दिला होता. या रिपोर्टच्या आधारे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सरकारला टार्गेट केलं.


या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारने रश्मी शुक्ला यांची चौकशी लावली होती. तसंच फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांचा माफीनामा आमच्याकडे आहे, असा दावाही त्यावेळी महाविकास आघाडीने केला होता.


महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी रश्मी शुक्ला यांचा पोलीस दलात पोस्टिंग आणि बदलीसाठी भ्रष्टाचार होत असल्याचा गोपनीय रिपोर्ट सार्वजनिक केला.


"या रिपोर्टची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती देण्यात आली होती," असा दावा फडणवीस यांनी केला. रिपोर्टच्या आधारे भाजपने गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं. "या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली.रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट 2020 मध्ये गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना हा रिपोर्ट महासंचालक सुबोध जयस्वाल यांना दिला होता.


'शुक्ला यांनी अवैधरित्या फोन टॅप केले'

राष्ट्रवादी कॉंग्रेसने देवेंद्र यांच्या आरोपांवर पलटवार केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ मंत्री नवाब मलिक यांनी"रश्मी शुक्ला भाजपच्या एजेंट आहेत," असं म्हणत आरोप फेटाळून लावले. तर रश्मी शुक्ला यांनी अवैधरित्या फोन टॅप केले, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.जितेंद्र आव्हाड म्हणाले, "शुक्ला यांना फोन टॅप करण्याची सवय पूर्वीच्या सरकारपासून होती असा आरोप आहे. तत्कालीन मुख्य सचिव (गृह) कुंटे यांनी अशी परवानगी दिली नव्हती हे स्पष्ट केलंय."


"एकाच्या फोन टॅपिंगची परवानगी मागितली आणि दुसऱ्याचे फोन टॅप करण्यात आले. मंत्र्यांचे फोनही टॅप करण्यात आले याचा आम्हाला दाट संशय आहे," असं आव्हाड पुढे म्हणाले.रश्मी शुक्ला यांच्या रिपोर्टवर राज्यमंत्रीमंडळात चर्चा झाली. फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेण्यात आली होती का? असा प्रश्न उपस्थित झाला."रश्मी शुक्ला यांनी याबद्दल माफी मागितली होती. चूक झाल्याचं लेखी लिहून दिलं. पण बरं झालं सरकारने हे पत्र परत दिलं नाही," असं आव्हाड म्हणाले.

एकापाठोपाठ एक होणाऱ्या आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकार बॅकफूटवर गेल्याची चर्चा सुरू झाली होती. पण शुक्ला यांनी आमदारांना धमकावल्याचा आरोप करून सरकारने विरोधकांवर हे प्रकरण उलटवण्याचा प्रयत्न केलाय.


काय म्हणाले होते परमबीर सिंह?


देवेंद्र फडणवीसांच्या अगोदर शुक्ला यांच्या रिपोर्टचा हवाला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टातील आपल्या याचिकेतही दिला होता.

"विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, 24 किंवा 25 ऑगस्ट 2020 ला राज्य गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलीस महासंचालकांना माहिती दिली. महासंचालकांनी गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पोस्टिंग आणि बदल्यांमध्ये गृहमंत्री अनिल देशमुखांच्या गैरवर्तनाची माहिती दिली. टेलिफोन इंटरसेप्शनच्या बेसवर ही माहिती मिळाली होती." असा दावा परमबीर सिंह यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला.

अनिल देशमुख यांच्यावर कारवाई न करता रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आल्याचं, सिंह यांनी याचिकेत म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post