प्रतिनिधी/ प्रमोद घाटे : संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे फिरून राहले असून बरेच नेते मंडळींना आता आमदार व्हायचे स्वप्न दिसून राहिले आहे .
तशीच परिस्थिती सध्या तिवसा विधानसभा मतदारसंघात आहे प्रत्येकाला वाटत आहे मीच आमदार होईल पक्ष मलाच तिकीट देईल आणि नाहीच दिला तर मी बंडखोरी करून अपक्ष उभा राहून निवडून येईल.
परंतु आपल्या जबाबदारीची कोणालाच जाणीव नाही आमदार होणे म्हणजे संपूर्ण मतदारसंघाचे पालकत्व घेणे असते. तेथील लहान मोठ्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढून तेथील नागरिकांना न्याय देणे असते आणि त्याच कामासाठी सामान्य नागरिक मतदार दर पाच वर्ष्यानीं मतदान आपली जबाबदारी म्हणून पार पाडत आलेला आहे.
अमरावती जिल्ह्यातील तिवसा विधानसभा मतदार संघात सर्वांत जास्त मतदार असणारे गाव म्हणजे नेरपिंगळाई विशेष म्हणजे तिवसा पेक्षा जास्त लोकसंख्या आणि जास्त मतदार येथे असून सुद्धा या ठिकाणी सुविधानचा अभाव असून लोकप्रतिनिधी सुद्धा येथील प्रश्न जास्त गांभीर्याने घेताना दिसत नाही.
येथील नागरिकांनसोबत चर्चा केली असता येथील महत्वाचे मुद्दे आहे नेरपिंगळाई शहराला नगर परिषद करणे कारण येथील लोकसंख्या 30000 च्या जवळपास असून ग्रामपंचायत निधीमधून येथील कामे होत नाही त्यामुळे नगरविकास मंत्रालयातुन येथे अर्थसहाय्य होणे गरजेचे आहे.
येथील पाणी प्रश्न मोठा गंभीर असून पावसाळ्यात सुद्धा 3 दिवसाआड नळ येते त्यामुळे नेरपिंगळाई साठी विशेष पाणी पुरवठा योजना आणण्यात यावी जेणे करून येथे रोज पाणीपुरवठा होईल.
नेरपिगळाई सह शिरखेड व धामणगाव महसूल मंडळ मिळून व अमरावती तालुक्यातील काही गावे मिळून नेरपिंगळाई हा स्वतंत्र तालुका तयार करण्यात यावा जेणे करून येथील जवळ जवळ 60 ते 70 गावातील नागरिक व विद्यार्थी यांना मोर्शी येथे न जाताना नेरपिंगळाई जी त्यांची मुख्य बाजारपेठ आहे येथेच त्यांची कामे होईल व मोर्शी तहसील वरील एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या गावाचा ताण कमी झाल्यामुळे दोन्ही तहसील मधील कामे वेगाणे व सुरळीत होईल अशी मागणी येथील नागरिकांची बरेच दिवसांन पासून असून त्यासाठी आमदार खासदार मंत्री जिल्हाधिकारी यांना बरेच निवेदन दिले आहे त्यावर तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकारात्मक दाखवली होती परंतु नंन्तर कोणत्याच प्रतिनिधी नि त्या विषयावर लक्षच दिलेले नाही.
येथील कचऱ्याचे विघटन आणि साठवन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड असणे अतिशय आवश्यक आहे.
विद्यार्थी सह पोलीसभरती साठी सराव करणारे बरेच मुलं व मुली गावातून गेलेल्या नागपूर इंदोर राज्यमार्गावरून धावन्याचे सराव करतात परंतु अश्याप्रकारे रस्त्यावरून धावणे किती योग्य आहे उद्या काही अनुचित झाले तर कोण जबाबदार असेल त्यामुळे येथे एक अत्याधुनिक तालुका क्रीडा संकुल असयला पाहिजे अशी नागरिकांची मागणी आहे.
नेरपिंगळाई येथील आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली असून येथे डॉक्टर सुद्धा नाही बरेचदा निवेदन देऊन सुद्धा येथे डॉक्टर उपलब्ध झालेला नाही परंतु कोणत्याच जणप्रतिनिधीनि त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही त्यामुळे येथे उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे दर्जाचे रुग्णालय करावे अशी मागणी आहे.
एवढे मोठे शहर असून येथे साधे पोलीस चौकी नाही त्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते शासनाचे उंबरठे झीजवट आहे परंतु त्यावर कोणी लक्ष देत नाही एवढा मोठ्या गावाचा कारभार शिरखेड पोलीस स्टेशन च्या अंतर्गत येत असून शिरखेड वरून एवढ्या मोठ्या गावाचा कारभार सांभाळणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकण्यासारखेच आहे परंतु त्याबाबत सुद्धा लोकप्रतिनिधी उदासीनताच दाखवत आहे.
रिद्धपूर तिवसा नेरपिंगळाई मार्गे एकही जलद राज्य मार्ग परिवहन ची बस नाही जी परतवाडा किंवा चांदुरबाजार येथून सुटून नागपूर वर्धा यवतमाळ या शहराना जोडेल या बससाठी मागील एक वर्षा पासून निवेदन व मागणी सुरु आहे परंतु महामंडळ कडून फक्त बस ची संख्या कमी आहे आणि भविष्यात मागणीचा विचार करू एवढेच सांगण्यात येते पण मागणी वर लक्ष कोणी देत नाही.
त्यामुळे तिवसा विधानसभा मधील इच्छुक उमेदवार यांनी नेरपिंगळाई येथील या मागणीचा विचार करावा कारण पक्षापेक्षा गावाचा विकास याच धोरणावर येथून मतदान होईल त्यामुळे विकासत्मक मुद्दे जो करायचे आश्वासनच नाही तर कामे पूर्ण करायचे हमी देईल यावेळी त्यालाच मतदान होईल एवढे मात्र नक्की.