अचलपूर–परतवाडा परिसरात अवैध “ट्रमीन इंजेक्शन” विक्रीमुळे युवक धोक्यात


Achalpur



आरोग्य सभापती शमशेर खान आणि नगरसेवक फिरोज खान यांनी उपस्थित केला गंभीर मुद्दा


प्रतिनिधी फिरोज खान 

अचलपूरअचलपूर व परतवाडा परिसरात सध्या “ट्रमीन इंजेक्शन” या नावाने ओळखल्या जाणाऱ्या नशेच्या औषधाची अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाकडे आरोग्य सभापती शमशेर खान बिस्मिल्ला खान तसेच नगरसेवक फिरोज खान यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे।

मिळालेल्या माहितीनुसार, काही मेडिकल दुकानदारांकडून हे इंजेक्शन बेकायदेशीररित्या विकले जात असून, याचा सर्वाधिक परिणाम युवक आणि मजूर वर्गावर होत आहे. या व्यसनामुळे अनेकांमध्ये नशेची सवय झपाट्याने वाढत असून, त्यांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे।

आरोग्य सभापती यांनी सांगितले की, अचलपूर, परतवाडा तसेच अमरावती परिसरात काही असामाजिक घटक खुलेआम या नशेच्या इंजेक्शनचा व्यापार करत आहेत. या प्रकारामुळे परिसरातील सामाजिक वातावरण बिघडत असून, नव्या पिढीचे भविष्य धोक्यात येत आहे।

त्यांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट केले की, या अवैध व्यवसायावर तात्काळ नियंत्रण ठेवले नाही, तर ही समस्या भविष्यात अधिक गंभीर होऊ शकते. संबंधितांवर कठोर कारवाई करून या प्रकाराला आळा घालण्याची त्यांनी मागणी केली आहे।

 •“ट्रमीन इंजेक्शन”चे दुष्परिणाम •

तज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या नशेच्या इंजेक्शनचा वापर अत्यंत घातक असून त्याचे पुढील परिणाम दिसून येऊ शकतात:

शरीरावर तात्काळ तसेच दीर्घकालीन दुष्परिणाम

मेंदूवर परिणाम होऊन निर्णयक्षमता कमी होणे

व्यसनाधीनता वाढून मानसिक असंतुलन निर्माण होणे

रक्तदाबात अनियमितता व हृदयविकारांचा धोका

सुई शेअर केल्यास संसर्गजन्य आजारांचा प्रसार

गंभीर परिस्थितीत अचानक मृत्यूचा धोका
 प्रशासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी

या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या अवैध धंद्यावर त्वरित छापेमारी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच युवकांना या घातक व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम राबविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

ही समस्या केवळ कायदा व सुव्यवस्थेपुरती मर्यादित नसून समाजाच्या भवितव्याशी संबंधित आहे. त्यामुळे प्रशासन, समाज आणि पालकांनी एकत्र येऊन या गंभीर समस्येवर प्रभावी उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post