गावाकडची बातमी| शेतकऱ्याने पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही: नुकसान भरपाईची मागणी

 

Kinvat_Farmer


 

कनकवाडी येथील शेतकऱ्याने पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही: नुकसान भरपाईची मागणी


Farmer



किनवट : किनवट तालुक्यातील कनकवाडी गावातील शेतकरी नंदकिशोर विठ्ठल सोळंके यांनी एशियन कंपनीच्या JS-9305 वाणाच्या सोयाबीन बियाण्यामुळे मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची तक्रार मा. कृषी अधिकारी, पंचायत समिती किनवट यांच्याकडे दाखल केली आहे.

शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दिनांक 1 जून 2025 रोजी त्यांनी श्रीराम फर्टीलायझर्स येथून सदर बियाणे (प्रत्येकी 30 किलोचे 2 पॅक, बॅच नंबर 24-12-996) खरेदी करून 2 एकर क्षेत्रावर पेरले. मात्र, पेरणीनंतर सध्यातरी बियाण्याचा उगम अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

विशेष म्हणजे, शेजारील शेतकरी यांनी त्याच दिवशी व त्याच पद्धतीने पेरणी केली असून, त्यांच्या शेतातील सोयाबीन चांगल्या प्रमाणात उगमले आहे. यावरून सदर बियाणे दोषयुक्त असल्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याशिवाय, गावातील अन्य ३-४ शेतकऱ्यांनाही अशाच प्रकारचा अनुभव आला आहे.

नंदकिशोर सोळंके यांनी आपल्या तक्रारीसह खालील पुरावेही सादर केले आहेत..

बियाण्याचे खरेदी बिल, बॅच नंबर व पिशवीचे फोटो, उगम न झालेल्या क्षेत्राचे फोटो, शेजारी शेतकऱ्याच्या शेतातील उगमाची तुलना

सदर प्रकारामुळे नुकसानग्रस्त शेतकरी यांनी कृषी विभागाने तत्काळ पाहणी करून पंचनामा करावा व नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी केली आहे. सद्य:स्थितीत शेतकऱ्यांच्या रोजीरोटीसाठी शेतीच एकमेव आधार असल्याने प्रशासनाने तात्काळ सकारात्मक पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post