Gavakadachi Batmi network
गेली पाच महिन्यापासून हरसुल ते गुजरातला जोडणारा एकमेव पूल याचे काम चालू असताना तोंडावर आलेला पावसाळा
याचे महत्त्व समजून सामाजिक कार्यकर्ते हिरामण गावित यांनी व सामाजिक कार्यकर्ते जीवन भोये यांनी
या कामाचा पाठ पुरवठा केला पण सर्व सरकारी अधिकारी व कंत्राटदार यांच्या कामात हलगर्जीपणामुळे एक पुलाचे काम चालू असताना पर्यायी मार्ग मातीचा पूल तयार केला होता.
तो ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पाण्याने पूर्णपणे वाहून गेला या कारणाने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
कंत्राटदार आणि अधिकारी वर्ग यांच्या सर्रासपणे दुर्लक्ष झाल्यामुळे या सर्वांचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. सदरील पूर्ण कामाची चौकशी होऊन हे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे.सामान्य नागरिकांची गैरसोय दूर करण्यात यावी अन्यथा याच मार्गावर मोठे आंदोलन उभारण्यात येईल.असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हिरामण गावित आणि जीवन भोये यांनी दिला आहे..