विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे
बुलढाणा : आजही देशातील आदिवासी समाज मागासलेला असून आद्याप पर्यंत आदिवासी समाजाचा विकास झाला नाही. शासनाच्या योजना कागदावरच असून प्रत्यक्षात खऱ्या आदिवासींना लाभ मिळत नाही. शासन आदिवासीचा निधी इतरत्र वापरत असल्यामुळे आदिवासी फार मोठा अन्याय होत आहे, त्यामुळे आदिवासीचा विकास थांबणार आहे. म्हणून अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आदिवासींनी एकत्र यावे, असे आवाहन आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी केले.
आदिवासीच्या न्याय व हक्कासाठी साततत्याने काम करणाऱ्या आदिवासी विकास परिषदेची बैठक १६ जून २०२५ रोजी खामगाव येथे पार पडली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदिनी टारपे बोलत होत्या. यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी सुखदेवराव डाबेराव तर प्रमुख पाहूणे बबलू राठोड, ज्ञानेश्वर राठोड व वाशिमच्या जिल्हाध्यक्ष सिता धंदरे, महासचिव संगीता बारेला होत्या. यावेळी खामगाव तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच विदर्भस्तरीय प्रबोधन मेळाव्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदिवासी नेते सुखदेवराव डाबेराव यांनी येणाऱ्या काळात एकत्र येऊन लढा दिला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
खामगावचे गजानन सोळंके यांनी आपले विचार व्यक्त केले. यावेळी खामगाव अध्यक्ष गोपाल चव्हाण, शेगाव तालुकाध्यक्ष अमोल राठोड, मेहकर तालुकाध्यक्ष वासुदेव बोरकर, नीलेश रामदास पवार, मंगलसिंग राठोड, महेंद्र चव्हाण, भिमसिंग पवार, नीलेश पवार, सागर चव्हाण, विनोद डाबेराव, प्रताप राठोड, विनोद सोळंके, मोताळा तालुकाध्यक्ष विजय चव्हाण भोसले, वासुदेव बोरकर, महेंद्रसिंग डाबेराव, लक्ष्मण सोळंके इत्यादी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हाध्यक्ष सोपान सोळंके यांनी तर सूत्रसंचालन मंगलसिंग राठोड यांनी व आभार प्रदर्शन महेंद्रसिंग चव्हाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.