प्रतिनिधी :- पवन पाटणकर
शिराळा : भारत सरकार राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डॉ. मनीष गवई व दैनिक मतदार राज वृत्तपत्राचे संपादक विजय गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित अभिष्टचिंतन सोहळा नुकताच अमरावती येथील जोशी हॉल येथे पार पडला.
त्या निमित्ताने विविध क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे कलाकार, पत्रकार, सामाजिक, राजकीय, क्षेत्रामध्ये त्यांनी केलेल्या कामगिरी बद्दल त्यांच्या कला, गुणांना वाव देण्याकरिता पुरस्कार वितरण सोहळ्याचे व वृक्ष वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
त्या निमित्ताने शिराळा येथील अमरावती शिवसेना तालुका प्रमुख राजकीय वारसा असलेले, परंतु सदैव सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे राजकारणा सोबतच सामाजिक कार्याला महत्व देऊन, आपल्या आयुष्यात 20 % राजकारण व 80 % सेवा कार्य, समाजकार्य करणारे व सर्व समाजातील गरीब व तळागाळातील, नागरिकांच्या अडचणी सोडवायला तत्पर असणारे, सेवाभावी वृत्तीचे शिवसेना तालुका प्रमुख मंगेश काळमेघ यांना त्यांनी केलेल्या सामाजिक व राजकीय कार्याची पावती म्हणून " समाजभूषण "पुरस्काराने गौरविण्यात आले.
सदैव गावाच्या विकासावर भर देऊन गावातील विकासकामे करणे व शासकीय योजनेचा लाभ तळागाळातील गरीब व गरजू नागरिकांना मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्नशील असतात.
राजकीय पाठपुरावा करून समाजकारण घडवून आणणे याकरिता ते संपूर्ण मतदार संघामध्ये परिचित आहे.
एकीकडे इतर लोकप्रतिनिधी स्वतःचा स्वार्थ साधतात व स्वतः मोठे होण्याचा प्रयत्न करतात, स्वतःचा समाज, राजकीय पक्ष, नातेवाईक, मित्रमंडळ, यांना प्राधान्य देतात तर दुसरीकडे मंगेश काळमेघ हे सर्व समाजातील, तळागाळातील, कुठलाही राजकीय भेदभाव न करता मग तो नागरिक कुठल्याही राजकीय पक्षाचा असो, कुठल्याही समाजाचा असो त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता गरजू नागरिकांना योग्य न्याय देण्यात अग्रेसर व सर्वांचे परिचित आहे.
महाराष्ट्र शासनातर्फे जो घरकुल योजनेचा सर्वे करण्यात आला त्या मध्ये सुद्धा मंगेश काळमेघ यांचे मोलाचे योगदान आहे त्यांनी आपले सहकारी कार्यकर्ते सोबत घेऊन संपूर्ण गावातील नागरिकांच्या घरापर्यंत जाऊन तळागाळातील, गरीब व गरजू नागरिकांना कुठलाही सामाजिक व राजकीय भेदभाव न करता घरकुल सर्वे मध्ये समाविष्ट केले जेणेकरून या योजनेचा लाभ गरीब व गरजू नागरिकांना मिळेल.
एकीकडे इतर लोकप्रतिनिधीनी आप्त नातेवाईक, समाज व राजकीय पक्षाशी निघडीत नागरिकांना नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला अशा लोकप्रतिनिधीना अपवाद म्हणजे शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश काळमेघ लोकांच्या मनातील उत्कृष्ट लोकप्रतिनिधी असे लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद ला निवडून यावे व तेव्हाच गावाचा विकास होईल अश्या प्रकारचे जण - मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
" जनतेच्या मनातील नेता, लोकनेता मंगेश काळमेघ. "
त्यांच्याच प्रमाणे त्यांचे कार्यकर्ते सुद्धा सामाजिक कार्यात अग्रेसर आहे.असेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे शिवसेनेचे कार्यकर्ते संकेत जानरावजी जीभकाटे ( श्रमिक इमारत व इतर बांधकाम कामगार संघटना )अमरावती तालुका अध्यक्ष त्यानासुद्धा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे शिराळा येथील पत्रकार तथा उपजिल्हाप्रमुख युवाशक्ती ग्रामविकास संघटन महाराष्ट्र राज्य व सामाजिक कार्यकर्ता जिल्हा प्रतिनिधी पवन साहेबराव पाटणकर यांना सुद्धा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्य, निर्भीड व निःस्पक्ष व उत्कृष्ट पत्रकारिते बद्दल पत्रकारिता क्षेत्रातील " दर्पण पुरस्काराने " गौरविण्यात आले..