गटारही तुंबले..!
विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
करंजगाव ग्रामपंचायत अंतर्गत रामनगर वार्ड नं पाच मध्ये सांडपाणी वाहून नेणारे गटार ( नाल्या) ओसंडून वाहत आहेत परंतु या कडे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य लक्ष देत नाहीत असे रामनगरमध्ये राहणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे मतं मागायला सदस्य दारोदारी फिरून मतं मागतात परंतु या भागात आदिवासी बांधवांची वस्ती जास्त प्रमाणात असल्याने जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते आहे का ? असाही प्रश्न येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे नाल्या पुर्णपणे चोक अप झाल्यामुळे सरपटणारे जीव घरात घुसून नागरिकांना ईजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही येथील स्ट्रीट लाईट सुद्धा महिनाभरा पासून बंद तरीही येजा करणारे सदस्य सरपंच उपसरपंच यांच्या नजरेतून सुटतात त्यामुळे तेसुद्धा पावसाळ्यात दुरुस्ती करत नाहीत ग्रामपंचायत अधिकारी गावात फार कमी दिसतात ग्रामपंचायत मध्ये गेलो असता ते सुद्धा भेटतं नाहीत अशी ओरड गावातील काही लोक करीत आहेत.
Tags : #ग्रामपंचायत, #करंजगाव, #अचलपूर, #चांदूरबाजार #अमरावती, #amaravatinews, #Maharashtra, #india, #grampanchayat, #Achalpurnews