माना पोलिसांनी कत्तलीसाठी घेवून जात असलेल्या सहा बैलांचे वाचविले प्राण

 

गावाकडची बातमी


तालुक्यातील शेलूबाजार फाट्यानजीकची घटना 


 तीन लाख पन्नास हजाराचा मुद्देमाल जप्त




मूर्तिजापूर : तालुक्यातील माना पोलीस स्टेशनच्या हद्दीत शेलूबाजार फाट्यानजीक टाटा एस या वाहनातून सहा बैलांना कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून घेवून जात असलेल्या तिघा आरोपिंना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नाकाबंदी करून मुद्देमालासहित अटक केल्याची घटना 4 मे रोजी सकाळी 4 वाजून 50 मिनिटांनी समोर आली आहे.

तालुक्यातील माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरज सुरोशे यांना कत्तलीसाठी बैलांची वाहनातून तस्करी होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाल्यावर शेलूबाजार फाट्यानजीक पोलिसांनी नाकाबंदी केली. दरम्यान एक टाटा एसी क्र एम एच 28 एबी 0744 व टाटा मेगा एक्सल क्र एम एच 47 वाय 4293 या दोन वाहनाची झाडझडती घेतली असता सहा बैल निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची कबुली मोहम्मद तौफिक मोहम्मद रफीक वय (35)रा. मोहम्मदीया प्लॅट मूर्तिजापूर, अजहर अहमद जलील अहमद वय (22), मजहर अहमद जमीर अहमद वय (24 ) दोघेही रा. खोलापूर ता. भातकुली, जि. अमरावती यांनी दिली. तीनही आरोपीना मुद्देमालासह ताब्यात घेवून माना पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आला.

6 बैल जातीची जनावरं आढळून आले याची कींमत 80,0000 रू चे दोन टाटा एसी वाहन यांची किमंत 130,000 रू. व 140,000 रु.चे असा एकुण 3,50,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला या घटनेची फिर्याद पो हे कॉ मंगेश एकनाथ इंगोले यांनी दिल्यावरून कलम 5, 5 अ, 5 ब, 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा सह कलम 11 प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई सदर कारवाई ठाणेदार सुरज सुरोशे, उपनिरीक्षक गणेश महाजन, पोहेका मंगेश इंगोले, पोहेका राजेश डोंगरे, पोहेका जयकुमार मंडावरे, पोका निलेश देशमुख, पोका ललित बनचरे यांनी केली. पुढील तपास ठाणेदार सुरज सुरोशे यांच्या मार्गदर्शनात पो हवा राजेश डोंगरे हे करित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post