बुद्धगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या स्वाधीन करण्यात यावे व बी.टी.एम.सी.1949 चा कायदा पूर्णपणे रद्द करण्यात यावा. भिमक्रांती संघटनेची मागणी

Bhim kranti



 मुख्यमंत्री बिहार राज्य सरकार यांना तहसिलदार तहसिल कार्यालय,वरुड यांच्या मार्फत निवेदन 

 

बी.टी.एम.सी. अँक्ट १९४९ पुर्ण पणे रद्द करावा व बौद्धगया येथील महाबोधी महाविहार येथील गैर बौद्धाचे अतिक्रमण काढण्यात येऊन महाबोधी महाविहार (बिहार राज्य) च्या ट्रस्टची व्यवस्थापन समिती ब्राम्हण मुक्त करुण बौद्धाच्या ताब्यात देण्यात येणे बाबत. महाबोधी महाविहार परीसराच्या आत गैरबौद्धांच्या वतिने होणाऱ्या पुजाविधी व कर्मकांड करण्यावर प्रतिबंध घालण्यात यावा. अशा आशयाचे आज दिनांक 30 मे 2025 रोजी भिमक्रांती सामाजिक संघटना,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वरूड तालुका शाखेचे वतीने निवेदन देण्यात आले.

   याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल ढेकेकर,अमरावती कामगार जिल्हा अध्यक्ष सुमित गणवीर,वरुड तालुका अध्यक्ष सिद्धार्थ गौरखेडे,वरुड तालुका संघटक अजय साव,वरूड तालुका कार्यकारणी सदस्य घनश्याम मगरे,चंद्रशेखर पाटील गणेशपुर ग्राम शाखा अध्यक्ष,प्रवीण गवळी पुसला ग्राम शाखा अध्यक्ष,ज्ञानेश्वर लोखंडे मोर्शी खुर्द ग्राम शाखा अध्यक्ष,अरविंद मेश्राम, कांचन चंद्रशेखर पाटील इत्यादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post