किनवट/गोकुंदा परिसरात विजेचा लपंडाव

 

किनवट/गोकुंदा परिसरात विजेचा लपंडाव




किनवट:किनवट गोकुंद्यात सुभाष नगर, समता नगर व व्हीआयपी कॉलनी,पेटकुले नगर, बिलाल नगर, हबिब कॉलनी या सर्वच परिसरामध्ये रात्रीला व दिवसादेखील विजेचा पुरवठा वेळोवेळी खंडित होत असून यास सर्वस्वी महावितरण विभागातील कर्मचारी जबाबदार आहेत. अनेक दिवसापासून या परिसरामध्ये लाईटची नेहमीच ये जा सुरू असून यामुळे मुलांच्या अभ्यासावर परिणाम होत असून तसेच लाईट नसल्यामुळे रात्रीला मच्छराचा त्रास होऊन अनेक नागरिक बिमार पडत आहेत.

 या सर्व बाबिस महावितरण कर्मचारी जबाबदार असून शेवटी हा लाईटचा लपंडाव केंव्हा बंद होईल अशी चर्चा अनेक सुजाण नागरिकांतून बोलल्या जात आहे. कुठल्याही प्रकारचे हवा पाणी नसताना व कोणताच अडथळा नसताना नेमकी रात्रीला लाईट खंडित करण्याचे कारण काय, अशा लाईटच्या लपंडावामुळे अनेक छोटे मोठे व्यापारी त्रस्त असून ज्यांचे काम हे केवळ विद्युत पुरवठ्यामुळे चालते असे व्यापारी उपासमारीच्या संकटाला सामोरे जात आहेत. या बाबीकडे महावितरणातील कर्मचाऱ्यांनी लक्ष देऊन नागरिकास सुरळीत वीज पुरवठा करावा व सर्वसामान्य नागरिकांना या विद्युत त्रासापासून मुक्तता करावी ही मागणी सर्व सामान्य जनतेतून ऐकावयास मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post