नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प देत आहे शेतकऱ्यांसाठी संजीवनी वरदान !

 


                                                                                                  प्रतिनिधी- पवन पाटणकर शिराळा

 शिराळा :- सन 2024 25 मध्ये यावली शहीद गावाची महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जागतिक बँक अर्थसाहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मध्ये निवड झाली असून सदर प्रकल्प अंतर्गत दिनांक 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2025 दरम्यान यावली शहीद येथील ग्राम कृषी विकास समिती अंतर्गत लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन करून गाव स्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करण्यात आला.हवामान बदलाच्या संकटांचा सामना करण्यासाठी आणि गावांना अधिक सक्षम बनवण्यासाठी राज्य शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प "पोकरा लोकसहभाग" योजनेअंतर्ग उबत सूक्ष्म नियोजन गावस्तरीय हवामान अनुकूलन आराखडा तयार करण्याचे काम व त्याकरिता यावली (श ) येथे विविध स्तरावर प्रभावी कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात आले असून त्या अंतर्गत यावली गावामधील नागरिकांनी खूप उत्साह आणि सकारात्मक दृष्टिकोनातून उस्फुर्त सहभाग घेतला ग्राम कृषी विकास समिती सदस्य आणि स्वयंसेवक यांचे सहकार्यामधून विविध उपक्रम व कार्यक्रम राबवण्यात आले. त्यामध्ये ग्राम कृषी विकास समिती सभा मशाल फेरी गाव बैठक मुलांच्या शाळेतील प्रभात फेरी , शाळेतील निबंध स्पर्धा मध्ये माझ्या स्वप्नातील शेती आणि शेतकरी तसेच चित्रकला स्पर्धा मध्ये माझ्या स्वप्नातील गाव हे विषय घेऊन स्पर्धा राबवण्यात आल्या त्यानंतर गाव नकाशा, लक्ष गटचर्चा, शिवार फेरी, श्रमदान विहिरी पाहणे, माती नमुना घेणे, महिला सभा, पशुधन मूल्य साखळी संवर्धन, संसाधन नकाशा , पिक निहाय आराखडा,ग्राम कृषी विकास समिती सदस्य सभा असे विविध उपक्रम राबवण्यात आले या कार्यक्रमामधून एकंदरीत तयार होत असलेला हवामान अनुकूलन आराखडा गावासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. या योजनेमुळे केवक नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण होणार नाही आहे तर गावांमधील सामाजिक आर्थिक विकास साधण्यास देखील मदत होणार आहे लवकरच या आराखड्याच्या अंमलबजावनी तून यावली गाव अधिक समृद्ध होईल असा विश्वास मंडळ कृषी अधिकारी नीता कवा ने ह्यांनी शेतकरी सभेमध्ये व्यक्त केला आहे.



    नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन मुळे आम्हाला नवीन तंत्रज्ञान आणि उपाययोजनांची माहिती आम्हाला आमच्या कृषी सहाय्यक  ज्योती ठाकरे यांच्याकडून मिळाली अशी शेतकरी बांधव प्रतिक्रिया देत आहे आता आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकतो आणि भविष्यात होणारा नुकसानी पासून स्वतःचा बचाव करू शकतो असेही त्यांचे दृष्टिकोन दिसत आहेत या योजनेमुळे गावातील नागरिकांमध्ये आत्मविश्वास वाढला असून शेतकऱ्यांचा योजना राबवण्याकरता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे हा प्रकल्प यावली गावांसाठी वरदान ठरणार असून सूक्ष्म नियोजन आराखडा मुळे यावली गावाला प्रत्येक विशिष्ट गरजेनुसार हवामान बदलाचा सामना करण्यासाठी कृती योजना मिळत आहे त्यामुळे केवळ शेतीस नव्हे तर संपूर्ण गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी आशा सर्व नागरिका वक्त करीत असून, या योजनेच्या माध्यमातून गावातील नैसर्गिक साधन संपत्तीचे व्यवस्थापन जलसंधारण मृदा संवर्धन संवर्धन पीक पद्धतीत बदल आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक भर देण्यात आलेला असून विशेष लक्ष केंद्रित केला जात आहे. यासाठी कृषी विभाग ग्रामविकास विभागाने यांच्या संयुक्त विद्यमानाने गावांमध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात आलेली आहे सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यासाठी गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग हा महत्त्वाचा ठरलेला आहे. त्यामुळे यावली गावातील भौगोलिक परिस्थिती पाण्याची उपलब्धता जमिनीचा प्रकार आणि हवामानातील बदल यांचा सखोल अभ्यास करून आराखडा तयार करण्यात आलेला त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये उत्साह आणि सकारात्मक बदल दिसून येत आहे सर्व शेतकरी बांधव व गावकऱ्यांमध्ये पहावयास मिळत आहे दिनांक 15 एप्रिल ते 21 एप्रिल या दरम्यान नियोजित वेळेनुसार लोकसहभागातून गाव स्तरीय सूक्ष्म नियोजन आराखडा तयार करण्यात आला.

     त्याकरिता ग्राम कृषी विकास समिती चे पदसिद्ध अध्यक्ष सरपंच शिल्पा तुषार खवले तसेच उपसरपंच नितीन रंगराव पाचघरे,विविध कार्यकारी सहकारी संस्था अध्यक्ष पंकज देशमुख, सुनील देशमुख समिती सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी दिनेश मोहोड इतर सर्व सदस्य, स्वयंसेवक तसेच कृषी मित्र सुनील लंगडे, रविंद्र वानखडे, कल्पक अंबडकर, व  रोशन खवले, अक्षय भोपळे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यावली यांचे विशेष सहकार्य लाभले. 

मंडळ कृषी अधिकारी निता कवाने मॅडम व कृषी पर्यवेक्षक कु शुभांगी बोंडे यांचे सदर नियोजना करता विशेष सहकार्य लाभले . यावली येथील कृषी सहाय्यक ज्योती ठाकरे यांनी दिलेल्या शेड्युल प्रमाणे सर्व कार्यक्रम व उपक्रम राबवण्यात अथक प्रयत्न केले असून त्यांचे नियोजन प्रभावीपणे करण्यात आले आहे. करीता सर्वाचे सहकार्य मिळाले असून करीता त्यांनी कृषी विभाग मार्फत सर्वाचे आभार मानले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post