गावाकडची बातमी | गावातील राजकारणामुळे गरीब व गरजू घरकुल लाभापासून वंचित

 

                    Gavakadachi Batmi 

अमरावती, शिराळा -: बेघर, गरजू व गरीब तळागाळातील लोकांना निवाऱ्याची सोय व्हावी याकरिता शासन प्रधानमंत्री आवास योजना राबवित आहे.

 शासन स्तरावर घरकुल योजना राबवीत असले तरी त्याचा लाभ गरीब व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ग्रामपंचायत स्तरावर चालते.

 अशातच शिराळा येथे प्रधानमंत्री आवास योजनेत काही ग्रामपंचायत सदस्य जातीपातीचे व समाजाचे राजकारण करून व गावातील अंतर्गत राजकारणाचा डाव काढण्याकरीता गरीब व गरजू कुणबी समाजातील व इतर समाजातील नागरिकांना घरकुल लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे.

 ज्या नागरिकांकडे रिकामी खुली जागा उपलब्ध आहे. व जो गरीब वर्ग आहे. योजनेच्या नियमावलीमध्ये बसतो परंतु तो कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याच्या जवळचा मित्र किंवा नातेवाईक किंवा समाजाचा नागरिक नाही. अशा नागरिकांना काही ग्रामपंचायत सदस्य राजकीय डावा पोटी त्यांना घरकुल योजने पासून वंचित ठेवून त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ न मिळू देण्याचा प्रयत्न करीत आहे.


गावातील अंतर्गत राजकीय राजकारण, जातीचे व समाजाचे राजकारण सुरू असल्यामुळे ज्या नागरिकांना आवश्यकता आहे असे नागरिक काही ग्रामपंचायत सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे घरकुल योजनेपासून वंचित राहत आहे.


 ज्या नागरिकांनी गावाचे प्रतिनिधित्व म्हणून गावाच्या विकासाकरिता ग्रामपंचायत सदस्यांची निवड केली तेच काही ग्रामपंचायत सदस्य जातीपातीचे व गावातील अंतर्गत राजकीय राजकारण व समाज घेऊन चालणारे द्वेष भावनेने नागरिकांना त्रास देऊन घरकुल लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे .

यामुळे शासन राबवित असलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेपासून खरे लाभार्थी नागरिक वंचित राहील. व त्यामुळे ज्यांना खरोखर गरज आहे गरजू आहे अशा लाभार्थ्यांना घरकुल मिळणार नाही.


 विशेषतः गरीब वर्गातील कुणबी समाजातील लाभार्थी व इतरही समाजातील लाभार्थी यांना डावलण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व त्यामुळे या गरजू लाभार्थ्यांचा काही ग्रामपंचायत सदस्यांमुळे घरकुल योजनेत विनाकारण बळी जात आहे.


 त्यामुळे स्थानिक जिल्हा प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करून जे खरोखर लाभार्थी आहे. गरजू व गरीब आहे.ज्यांना काही ग्रामपंचायत सदस्यांनी जाती समाजाच्या राजकारणापायी डावलण्याचा प्रयत्न केला. अश्या लाभार्थी नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी लाभार्थी नागरिक करीत आहे.


" शिराळा येथील गरजू व गरीब योग्य घरकुल लाभार्थ्यास तो कोणत्याही जाती धर्माचा समाजाचा असो किंवा पक्षाचा असो त्या लाभार्थ्यासाठी गावातील अंतर्गत राजकारण, व राजकीय मतभेद न करता योग्य न्याय मिळवून देण्यासाठी व घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता परिपूर्ण प्रयत्न करेल."

                             मंगेश काळमेघ

                शिवसेना अमरावती तालुका अध्यक्ष

Post a Comment

Previous Post Next Post