दहशतवादी हल्ल्यात ज्या नागरिकांचा मृत्यू झाला, त्यात केवळ एकाच धर्माचे नव्हते, तर मुस्लिम समुदायातील लोक ही शहीद झाले होते. त्यामुळे, "धर्म विचारून गोळी मारली गेली" ही अफवा पूर्णपणे निराधार आहे.
शहीद झालेल्या मुस्लिम बांधवांची नोंद हे सिद्ध करतं की, हे केवळ एकाच धर्मावरचं संकट नव्हतं. हे भारतावर झालेलं हल्लं होतं — आपल्या सगळ्यांवर.
पण दुर्दैवाने, आजही काही राजकीय पक्ष आणि माध्यमे या दुखद घटनेचा वापर आपापली राजकीय पोळी भाजण्यासाठी करत आहेत. हिंदू-मुस्लिम करत जनतेला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न चालू आहे.
आज गरज आहे ती कटुता आणि फूट पाडणाऱ्या चर्चा थांबवण्याची — आणि पुन्हा एकदा ‘एक देश, एक भावना’ याच तत्वावर उभं राहण्याची.
सामान्य नागरिक त्रस्त आहे — महागाई, बेरोजगारी, सुरक्षेची चिंता या सगळ्यांतून मार्ग शोधत असताना, नेतेमंडळी मात्र केवळ आरोप-प्रत्यारोप करण्यात गुंतलेली आहेत.
सरकारने उत्तर द्यायला हवं — देशाची सुरक्षा का भेदली गेली? दहशतवादी सारख्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, आजही आपण सुरक्षित आहोत का? की हे सगळे फक्त खोकले दावे होते? पुलवामा हल्ल्याच्या चौकशीचा अहवाल आजतागायत जनतेसमोर आलेला नाही, तोच इतिहास पुन्हा तर नाही ना घडत..?
देशाची जनता आता बोलण्यापेक्षा उत्तर मागते आहे — सरकारने कारवाई दाखवावी, आश्वासने नव्हे.
✍️ जाकीर हुसैन, आर्णी यवतमाळ महाराष्ट्र मो- 9421302699