१ मे महाराष्ट्र दिनी मूर्तिजापूरात हजारो शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन...!






 मूर्तिजापूर - निसर्गाची अवकृपा, पिकाचे कमी उत्पादन, हमी भावापेक्षा मिळालेला कमी बाजार भाव, वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेती तोट्यात येऊन परिणामी शेतकरी कर्जबाजारी झाला.वेळेत कर्ज न भरल्यामुळे थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. या सर्व समस्येवर न्याय मागण्यासाठी शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

    राज्याचे मुख्यमंत्री यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सातबारा कोरा करण्याचे आश्वासन जाहीर सभेतून शेतकऱ्यांना दिले होते परंतु त्याची पूर्तता अर्थसंकल्पात केल्या गेली नाही. मूर्तिजापूर तालुक्यातील निंभा , हातगाव, जामठी, कुरूम या चार महसूल मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या मदतीतून वंचित केले असून त्यांना 30 एप्रिल 2025 पर्यंत अतिवृष्टीची मदत द्यावी नाहीतर येत्या 1 मे 2025 रोजी येणाऱ्या महाराष्ट्र दिनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर रखरखत्या उन्हात बारा ते चार या वेळेत अनभोरा ते माना ,कुरूम मधापुरी परिसरातील हजारो शेतकरी अन्नत्याग आंदोलन करून अतिवृष्टी व कर्जमाफी साठी प्रशासन व सरकारचे लक्ष वेधून घेतील असा इशारा प्रगती शेतकरी मंडळ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, भारतीय किसान संघ, जनमंच, न्यू यंग बॉईज क्लब फार्मर्स ग्रुप, यंग बॉईज क्लब यांच्यावतीने उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार मूर्तिजापूर यांना देण्यात आला. निवेदनाच्या प्रती आमदार हरिष पिंपळे, जिल्हाधिकारी अकोला , तहसिलदार , ठाणेदार मूर्तिजापूर यांना देण्यात आल्या. या निवेदनावर राजू वानखडे, कैलास साबळे, राहुल राठी ,अभी पोळकट, पंकज वानखडे, मुन्ना नाईकनवरे, नंदकिशोर बबानिया, विकी तिवारी ,सुभाष मोरे, अनिल गावंडे, प्रीतम देशमुख, प्रा.सुधाकर गौरखडे, प्रा.श्रावण रणबावळे, प्रमोद खेडकर, मिलिंद वानखडे ,जनार्दन धाये संजय वानखडे ,अजाबराव वाहिले, श्रीकांत वानखडे, गणेश गावंडे, रणजीत इंगोले, गोपाल बांबल, सेवकराम लहाने, अनिल राठोड, सुभाष महल्ले ,संतोष रुद्रकार,निखिल खरबडकर , किसन लोडम, हरीदास फुके ,अरुण बोंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post