चंद्रमनी वानखडे यांचा भारत रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्र रत्न गुणगौरव या दोन पुरस्काराने सन्मानित...!

 





मूर्तिजापूर - तालुक्यातील सालतवाडा येथील युवा चंद्रमनी वानखडे यांचा नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय लक्षवेध सामाजिक संमेलन कोल्हापूर येथे,डॉ.बाबासाहेब आबेंडकर व महाराष्ट्र रत्न गुणगौरव  अशा दोन पुरस्काराने संन्मानित करण्यात आले. 

        रविवार दि. 20 एप्रिल 2025 ला  राजश्री शाहु महाराज नाट्यगृह दसरा चौक कोल्हापूर  येथे संपन्न झालेल्या लक्षवेधी सन्मान सोहळा 2025  चे उदघाटक धनजंय महाडीक खासदार,राज्यसभा सदस्य,  कोल्हापुर,प्रमुख अतिथी,मा.स्वपनील राजशेखर,अभिनेता,मा.शुभांगी गायकवाड, अभिनेत्री, प्रमुख पाहुणे बाळासाहेब गोरे,निर्माता दिग्दर्शक,कार्यध्यक्ष अ.भा.म.चित्रपट निर्माता महामंडळ,संदिप घुगे निर्माता सल्लागार समिती सदस्य सुरक्षा रक्षक मंडळ (महाराष्ट्र शासन) संमेलनाध्यक्ष प्रा.डॉ. बी एन .खरात संस्थापक अध्यक्ष किल्ले पर्यटन महोत्सव सेवा संस्था महाराष्ट्र , आदींच्या प्रमुख उपस्थितित चंद्रमनी वानखडे यांना अभिनेता स्वप्नील राजशेखर व शुभांगी गायकवाड अभिनेत्री यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. 

      चंद्रमनी नारायणराव वानखडे यांच्या सामाजिक कार्याचा व ध्येयवादी वृत्तीचा प्रस्ताव  दिला असून त्यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय आई,भाऊ,बहीण ,वहीनी,पुतणे,मुलगी,किसा गोतमी महीला संघ सालतवाडा व मित्र मंडळी व गुरु वामनराव वानखडे , शिष्य गजानन चव्हाण व धनराज वानखडे,अनिल डायलकर व गावकरी मंडळी यांना दिले आहे. 

         वानखडे यांना पुरस्कार  प्राप्त झाल्याने आप्तजनांसह मित्र परिवार,  जि.प.शाळा सालतवाडा व गावकऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post