राधिका फाउंडेशनकडून ५१ महिलांचा ‘वीरनारी" सन्मान

 



 नाशिक :  आज दिनांक २३/३/२०२५ रोजी वीर माता सन्मान सोहळा पंडित कॉलनी राधिका फाउंडेशन च्या वतीने महिला दिन व शहीद दिनाचे औचित्त्य साधत ५१ वीरमाता व वीरपत्नी वीरनारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

   हा कार्यक्रम २३ मार्च २०२५ रोजी, लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी नाशिक येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी कविता पाळदे (हिंदू रक्षक रणरागिणी), लहवित, संजय देशमुख साईधन वर्षा फाऊंडेशन अध्यक्ष, अरविंद सोनवणे, राधिका फाऊंडेशन बागलाण अध्यक्ष, हर्षाली भोसले अभिनेत्री राधिका फाऊंडेशन ब्रँड अँबेसिडर, लोकसाक्ष न्युज चे मुख्य संपादक सुरेश चव्हाण हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. संस्थापिका डॉ.चेतना सेवक अध्यक्षस्थानी होत्या. सूत्रसंचालन पुनम भांबरे व सुरेश चव्हाण यांनी पार पाडले. अंकिता कुलकर्णी यांनी गणेश वंदना सादर करत कार्यक्रमाची सुरवात केली.

प्रमुख पाहुण्यांनी महिलांच्या योगदानाचा गौरव करताना, महिलांनी स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा असा संदेश दिला. डॉ.चेतना सेवक यांनी महिला दिन वर्षभर साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच शहीद परिवारा ला समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असे आव्हान केले. पुरस्कारार्थी महिलांनी राधिका फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले. यासाठी चंदू काका सराफ व लोकमान्य मल्टीपर्पज बँकेचे पण सहकार्य लाभले.

    राधिका फाउंडेशनचे विकी कुटे, रेखा काळे, कल्पना पवार, शैला ठाकर, उज्वला चौधरी, शीतल काकूळते यांनी हा कार्यक्रम अत्यंत आनंदात पार पाडला. यावेळी आलेल्या वीरपत्नी, वीरमाता या अतिशय भावुक झाल्या होत्या आणि मनमोकळेपणाने त्यांनी आपली मनोगत व्यक्त करत त्यांच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी बोलून दाखवल्या. डॉक्टर चेतना यांनी खूप सुंदर असं व्यासपीठ आम्हाला निर्माण करून दिल, आमचा गौरव सन्मान केला अशा देखील भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. यावेळी सर्व मान्यवर, सर्व सन्मानार्थि, राधिका फाउंडेशनचे सहकारी यांचा येथायोग्य सन्मान करण्यात आला. अतिशय आगळा वेगळा आणि स्तुत्यप्रिय असा उपक्रम राधिका फाउंडेशन आणि लोकसाक्ष न्यूज यांनी यावेळी राबवला. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. 

Post a Comment

Previous Post Next Post