मूर्तिजापूरात पत्रकार बांधवांचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
मूर्तिजापूर - अकोला येथील पत्रकार हल्लाप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या मार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
अकोला येथील पत्रकार विठल महल्ले यांच्यावर काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी खुनी हल्ला केला आहे. संबंधित आरोपींवर " पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत " कठोर कारवाई करण्याची मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने एका निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी यांना तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्यामार्फत करण्यात आली आहे.
१९ मार्च रोजी रात्री च्या वेळी पत्रकार विठ्ठल महल्ले हे आपले कार्यालयीन कामकाज आटोपून घरी जात असतांना खडकी रोडवरील एस टी डेपो नजिक अज्ञात समाजकंटकांनी पत्रकार महल्ले यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सुदैवाने महल्ले हे बाल बाल बचावले असले तरी राज्यात इतरही जिल्ह्यात विविध माफियांकडून पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रकार थांबता थांबता थांबत नसल्याने शासनाने पत्रकारांच्या समस्येकडे व पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी मूर्तिजापूर तालुक्यातील समस्त पत्रकार बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करण्यात आली आहे.
यावेळी जेष्ठ पत्रकार प्रा. दिपक जोशी, प्रा.अविनाश बेलाडकर, विलास नसले, मिलींद जामनिक, प्रतिक कुऱ्हेकर, जयप्रकाश रावत, संतोष माने, धनराज सपकाळ, गौरव अग्रवाल, अजय प्रभे, रोहित सोळंके, दिपक अग्रवाल, अंकुश अग्रवाल, बाळासाहेब गणोरकर, विलास वानखडे आदी पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.