छायाचित्र- ईलीयास बावानी माहूर
जंगली जनावरांसह पाळीव प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर
शेतातील विहिरी विहिरींची पाणी पातळी खालावली
माहूर तालुक्यात बंधाऱ्यासाठी झालेला; कोट्यवधींचा खर्च खर्च गाळात रुतला
लघु जलसंधारण विभाग नांदेडचे अभियंता सिराज पाशा भाई एनीटाईम नॉट रिचेबल विभाग नांदेड
श्रीक्षेत्र माहूर : पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे हाती घेतली. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मात्र या कामांची यशस्वीता पाहता माहूर तालुक्यात 'आऊटपूट' शून्य शून्य असून कोट्यावधीचा खर्च करून दोन डझनावर बांधलेल्या बंधार्यात पाण्याचा थेंब दाखवा आणि इनाम मिळवा अशी चर्चा माहूर तालुक्यात कोट्यावधीचा खर्च वायफळ गेल्याने होत आहे.
दरवर्षी पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने दरवर्षी दुष्काळी परिस्थितीत भर पडत आहे. पावसाचे कमी होत असलेले प्रमाण, पाण्याचा वाढता उपसा, घटलेली साठवण क्षमता, खताच्या वाढत्या वापराने जमिनीची घसरलेली पोत आदी कारणे दुष्काळासाठी जबाबदार असली तरी नियोजनाचा अभावही कारणीभूत आहे.
माहूर तालुक्यात तालुका कृषी कार्यालय, जल संधारण विभाग,सामाजिक वनीकरण, पंचायत समिती कार्यालय, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायत आदीमार्फत मागील दोन-तीन वर्षात शेकडो बंधाऱ्याची निर्मिती झाली. यात वनराई बंधारे, कोल्हापुरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, माती नालाबांध, शेततळे, ढाळीचे बांध आदी प्रकारच्या कामाचा समावेश आहे. यामध्ये आता कोटी रुपयांची कामे समाविष्ट करण्यात आली परंतु अपवाद वगळता एकाही बंधाऱ्यात पाणी असल्याचे एकदाही दृष्टीस पडले नाही. गतवर्षी अनेक मोठ्या पदाधिकाऱ्याकडून थेट मंत्रालयातून कोट्यावधी रुपयाची अनेक बंधारे बांधण्यात आले त्यातही पाणी साठवलेले दिसून येत नाही
आजच्या स्थितीत बंधाऱ्यांची स्थिती दयनीय आहे. काही बंधारे सदोष असल्यामुळे त्यात पाणीच थांबू शकले नाही. बहुतांश बंधाऱ्यांचे दरवाजे चोरीस गेल्याने पाणी साठविणे अशक्य झाले. काही बंधाऱ्यातील गाळ उपसला नसल्याने बंधाऱ्यात पाणी साठविण्याचे उद्दिष्ट साध्य होऊ शकले नाही. याला जबाबदार कोण? हे तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
जल संधारण विभागाने अनावश्यक ठिकाणी बंधारे बांधल्याने लाखो रुपयांचा निधी पाण्यात गेला. 5 लाखांपासून 12 लाखांपर्यंतचा खर्च एका बंधाऱ्यावर करण्यात आला. पाणी अडविण्यापेक्षा पैसे जिरवण्यातच अधिकाऱ्यांनी धन्यता मानली.हे वास्तव असुन कोटी रुपये पेक्षा जास्त रकमेचे अनेक बंधारे आजही अर्धवट अवस्थेत असल्याने या नाल्यांच्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
2024 वर्षात तालुक्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. यामध्ये अधिकारी व कंत्राटदारांची चांगलीच चांदी झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.2012 साली तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांच्या संकल्पनेतून तालुक्यात वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली. यामध्ये प्रत्येक शाळा, महिला व पुरुष बचत गट, ग्रामपंचायतीने हिरीरीने सहभाग नोंदविला.विशेष म्हणजे या कामासाठी कुठलेही अनुदान नव्हते. वनराई बंधाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी कायम राखण्यास मदत झाली होती. परंतु कोट्यवधी रुपये खर्च करूनही बांधण्यात आलेल्या विविध प्रकारच्या बंधाऱ्यामुळे पाणी जिरवण्याचा उद्देश यशस्वी होऊ शकला नाही. उलट निधी जिरवण्याची जणू शर्यतच तालुक्यात पाहायला मिळत आहे. त्यामुळे बांधलेल्या बंधाऱ्याची स्थिती आणि त्याची उपयोगिता तपासण्याची गरज निर्माण झाली आहे.
सन 2024 मध्ये माहूर तालुक्यातील सायफल, मेंडकी, बोरवाडी, मुंगशी, पानोळा, धानोरा (दि.),सतिगुडा, भगवती, मदनापूर, रूपानाईक तांडा, अंजनी, दत्तमांजरी, मेट,पापलवाडी, कासारपेठ आदी 15 ठिकाणी एकूण 20 बंधाऱ्याची निर्मिती सहा कोटी पेक्षा जास्त रक्कम खर्च करून करण्यात आली मात्र बंधाऱ्याची यशस्वीता पाहिल्यास कोट्यावधी रुपयाचा निधी व्यर्थ गेल्याचे चित्र पाहावयास मिळत असून कोट्यावधी रुपये खर्च करून बंधाऱ्यात एक थेंबही पाणी साठवू न शकणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे..