आंध जमातीतील कृतृत्ववान महिलाच्या पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न.
माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले पुस्तक प्रकाशन
मेहकर येथे आंध आदिवासी जमातीतील महिलांचा प्रबोधन मेळावा
बुलडाणा : विदर्भात मागिल तीन महिन्यापासून आंध आदिवासी महिलांचे प्रबोधन मेळावे व महिलाचे संघटन मोठ्या प्रमाणात चालू असून आता पर्यंत अकोला, पातूर, वाशिम मंगरुळपीर प्रबोधन मेळावे संपन्न झाले ,मेहकर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे निमित्ताने हनुमान टेकडी हनुमान मंदीरात समाज प्रबोधन व महिला संघटनेचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मंगला डाकोरे होत्या. यावेळी प्रमुख मार्गदर्शक आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे होत्या. त्याचबरोबर प्रमुख पाहुणे म्हणून कार्तिका ठाकरे, वाशिमच्या जिल्हा अध्यक्ष सीता धंदरे,मंगला ढगे, छाया डाकोरे मुक्ता ढोके, वैष्णवी ढोले, शकुंतला पांडे,शारदा फुपाटे, रंजना कोकाटे, मिरा धनजकर,मंगला डाकोरे पार्वती लठाड आदी मान्यवर महिला होत्या.
यावेळी आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक नंदिनी टारपे आपल्या भाषांनातून बोलताना म्हणाल्या आज संपूर्ण देशात आदिवासी महिलावर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार वाढला असून आदिवासी महिलांचे जगणे कठीण झाले आहे, या अन्यायाल वाचा फोडायची असेल तर महिलाचे संघटन होणे काळाची गरज आहे.
त्याच बरोबर महाराष्ट्रात आंध आदिवासी जमात मोठ्या संख्येने असून आंध जमातीतील महिला अनेक वर्षापासून सामाजिक चळवळीत व राजकीय क्षेत्रात काम करत आहेत पण त्या आदिवासी असल्यामुळे त्याची नोंद कुठेही घेतल्या जात नाही.
परंतु प्रा. डॉ. राजेशजी धनजकर सरांनी आंध आदिवासी जमातीतील सामाजिक राजकीय चवळीत काम करणाऱ्या महिलांची दखल घेऊन त्याच्यावर पुस्तक लिहिले त्यामुळे काम करणाऱ्या महिलांना आपल्या आयष्यात आणखी काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे, त्यामुळे येणाऱ्या पिढीला त्याचा मोठा फायदा होणार आहे. यावेळी अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील अनेक महिलांनी वैचारीक प्रबोधनात्मक भाषण केली.या कार्यक्रमात आदिवासी आंध जमातीची लोकसंस्कृती व आदिवासी आंध जमातीतील कर्तुत्ववान महिला असे दोन पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
माजी समजकल्याण मंत्री तथा आदिवासी विकास मंत्री ॲड. शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन झाले आहे.यावेळी प्रमुख पाहुणे जानकीराम डाकोरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भास्कर ठाकरे प्रा. डॉ. राजेश धनजकर,भगवानराव कोकाटे,नंदिनी टारपे होत्या, प्रमुख पाहुणे प्रा.धनजकर यांनी महिला बदल मत व्यक्त केले,आंध जमातीतील कृत्वात्वन महिलांवर पुस्तकं लिहिण्याची प्रेरणा माजी शिवाजीराव मोघे दिली.
त्यामुळेच पुस्तकं लिहू शकलो असे ते म्हणाले येणाऱ्या काळात नवीन तरुण पिढीला या पुस्तकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळणार आहे.मा.मंत्री शिवाजीराव मोघे यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शन केले.
आंध आदिवासींचे जमतातील महिलांच्या भविष्याला गती देण्याकरिता व प्रगतीच्या दिशेने जाण्याकरिता सदरील कार्यक्रमाचे आयोजिन केले. या कार्यक्रमाला बुलढाणा अकोला व वाशिम जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला आणि पुरुषांनी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती करवते,लता गिऱ्हे यांनी केले,प्रास्ताविक राधिका डाकोरे आभार प्रदर्शन वंदना लेकुरवाळे यांनी केले.