कर्जत(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)जनजागृती सेवा संस्था ही सामाजिक क्षेत्रात नेहमीच समाजाचे गांभिर्य लक्षात ठेवून वावरत असते.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ही संस्था आणि संस्थेचे सभासद समाजकार्य करण्यासाठी नेहमीच तयार असतात.कर्जत येथील संस्थेच्या सदस्यांनी हा फराळ वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला होता.दीपोत्सव अर्थात अंधार भेदून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचा संदेश देणारा सण.गरीब व गरजू लोकांची दिवाळी गोड जावी या उद्देशाने दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून जनजागृती सेवा संस्थेने कर्जत तालुक्यातील कडाव येथील सापेले आदिवासी पाड्यावर लहान मुलांना चाॅकलेट,आदिवासी भगिनींना आकर्षक पणती व फराळ वाटप करण्यात आले.प्रमुख पाहुणे म्हणून माऊली फाऊंडेशनचे उपाध्यक्ष व पत्रकार पंकेश जाधव,अॅड.सई सावंत,वनिता पाटील,रोहित पाटील हे उपस्थित होते.
आदिवासी पाड्यावरील भगिनींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला.फराळ वाटप उपक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन भंडारी,दत्ता कडुलकर,गंधाली तिरपणकर,संचिता भंडारी,पत्रकार पंकेश मधुकर जाधव,सार्थक भंडारी यांनी विशेष परिश्रम घेतले.हा उपक्रम संस्थेच्या सचिव संचिता सचिन भंडारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन यशस्वीरित्या राबविला,त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी त्यांचे विशेष आभार मानले.शेवटी उपस्थित बंधु-भगिनींना दिपावली पाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.