संपूर्ण शेतकऱयांना 14 दिवसानंतर जामीन मंजूर झाल्याने आंदोलक शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण पसरले आहेत त्यातच सर्व शेतकऱ्यांनी गुलाल उधळून व पुष्पहार घालून मोठ्या अभिमानाने स्वागत केले, तसेच सिंभोरा चौक ते तहसिल कार्यालय अशी विजयी फेरी काढून जल्लोष केला
अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समिती चे मागील 11 महिन्यांपासून मोर्शी तहसील कार्यालय येथे आत्मक्लेश आंदोलनं सुरु असून वारंवार आंदोलने करुन मागण्या मान्य न झाल्याने तसेच मुख्यमंत्र्यांनी शब्द न पाळल्याने अखेर सर्व प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी आमदार देवेंद्र भुयार यांच्या कार्यालयावर निवेदाद्वारे विनंती करण्याचे ठरवले होते मात्र तेथे गेल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना भुयार यांच्या कार्यालयात जाण्यास मज्जाव केल्याने आंदोलक आक्रमक होउन आत मधे शिरतांना पोलिसांनी शेतकऱ्यांवर जबरदस्तीने लाठीचार्ज केला व राजकीय दबावातून आंदोलक शेतकऱ्यांवर त्यामध्ये उमेश शहाणे, प्रवीण ढोले, गजानन पुरी, अमोल टाकले व प्रविण कोहळे या सर्वांवर 353 व 452 सारखे गंभिर गुन्हे दाखल करुन शेतकरी भवणातच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज झाल्याने मतदारसंघांत आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात मोठी नाराजी व्यक्त केल्या जात आहेत.
शेतकरी पुत्र म्हणून घेणाऱ्या आमदारांनेच शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहेत तसेच आंदोलनं करणे हा अधिकार असल्याने तसेच पोलिस व आमदार यांच्या संगनमताने हे अमानुष कृत्य केल्याचा आरोप युवासेना जिल्हा प्रमुख तसेच अप्पर वर्धा धरण ग्रस्त कृती समितीचे पदाधिकारी उमेश शहाणे यांनी केला आहे.
कितीही गुन्हे दाखल केल्याने तसेच काहीही आरोप केल्याने आंदोलन मोडून काढू हा विचार आमदार महोदयांनी आपल्या डोक्यातून काढून टाकावा तसेच शेतकऱ्यांसाठी न्याय मगतांना कितीही गुन्हे दाखल झाले तरी लढणे सोडणार नाही असा इशारा युवासेना जिल्हा प्रमुख उमेश शहाणे यांनी दिला आहे..