विशेष प्रतिनिधी संतोष भालेराव
गौरखेडा कुंभी ग्रामपंचायत हद्दीतील गावकऱ्यांच्या घरावर १५ दिवसांपूर्वी अकस्मात आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने मोठाले वृक्ष कोसळले आहेत त्यामुळे त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गावातील नागरिकांनी वेळोवेळी ग्रामपंचायत मधे जाऊन ग्रामसेवक यांना सांगितले आहे परंतु ते दुर्लक्ष करत असल्याचं गावकरी सांगतात तसेच पुष्कळ दिवसांपासून वृक्ष घरांवर कोसळल्याने घराचे नुकसान होऊन वृक्षांच्या वजनाचे घरही कोसळु शकते किशोर शेकोकार, साहेबराव धोटे यांच्या घरांवर वृक्ष कोसळले आहेत त्या वृक्षांची विल्हेवाट लावून त्रस्त नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे असे नागरिकांना वाटतें.
Tags
#गावाकडची बातमी