बदलापूर(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)
रविवार दिनांक 22 जून रोजी एबीज सभागृह, बदलापूर येथे आयोजित केलेल्या दिमाखदार सोहळ्यात जनजागृती सेवा संस्थेचा चतुर्थ वर्धापन दिन अनेक मान्यवर तसेच उत्साही कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत, उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. समाजातील अनेक प्रश्नांवर लढणारे, त्यासाठी सर्वस्व अर्पून समाजासाठी कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील कार्य संपन्न व्यक्तींना यावेळी " समाज रत्न पुरस्कार -2025 " प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांनी या कार्यक्रमाचा उद्देश सांगताना , समाजाच्या तळागाळात जाऊन काम करणारी ही माणसे म्हणजेच खरेखुरे हिरे असल्याचे प्रतिपादन केले. कित्येक लोक फक्त प्रकाश झोतात राहण्यासाठी किंवा प्रसिद्धी मिळवण्यासाठी कार्यरत असतात तर त्याचवेळी अनेक सामाजिक कार्यकर्ते समाजातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात आपापल्या परीने योगदान देत असतात. त्यांना प्रसिद्धी झोतात राहता येत नाही परंतु त्यांचे यथोचित कौतुक होणे आवश्यक आहे, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्यांचा उत्साह वाढवला पाहिजे यासाठीच या खऱ्याखुऱ्या समाज रत्नांचा आम्ही आमच्या परीने सन्मान करत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
जनजागृती सेवा संस्था स्वतः अनेक कार्यक्रमांचे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करते. शैक्षणिक साहित्य वाटप , सामाजिक विषयांवरील समुपदेशन कार्यक्रम, आरोग्यविषयक शिबिरे किंवा साहित्य वाटप यांसारख्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्था महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे. संस्थेच्या या निस्वार्थी समाज उपयोगी उपक्रमामुळे अवघ्या चार वर्षात संस्थेने हजारो कार्यकर्ते जोडल्याचे याप्रसंगी संस्थेच्या सचिव सौ संगीता भंडारी यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना संस्थेद्वारे केलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली. आजच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर महेश अभ्यंकर,.दिलीप नारकर, रामजीत गुप्ता, सुनील झळके, अविनाश सुर्वे, दीपक ठुकरुल, सुनील इंगळे, महेश्वर तेटांबे यांसारख्या अनेक प्रतिभावान व्यक्तींची प्रमुख उपस्थिती लाभली. राष्ट्रपती पदक विजेते माजी कमांडिंग ऑफिसर दिलीप नारकर यांनी याप्रसंगी संस्थेचे कार्याची प्रशंसा करताना सामाजिक बदलांसाठी समाजातील सजग नागरिकांनी स्वतः सक्रिय राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. बदलापूर शहरात कार्यरत असणाऱ्या सिटीजन वेल्फेअर असोसिएशन ही संस्था अशाच पद्धतीने समाजातील विविध क्षेत्रातील लोकांना संघटित करून सामाजिक, प्रशासकीय प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनावर दबाव ठेवण्याचे काम करत असल्याचे माहिती त्यांनी दिली. अशा संस्थांच्या माध्यमातून लोकांनी एकत्र येऊन प्रशासनाला सहकार्य अनेक गरज पडल्यास प्रसंगी प्रशासनाशी संघर्ष करण्याची तयारी ठेवावी असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. सेवानिवृत्त अधिकारी सुनील इंगळे यांनी याप्रसंगी बोलताना जनजागृती सेवा संघाच्या कार्याचे कौतुक केले तसेच भ्रष्टाचार मोडून काढण्यासाठी एकजुटीने संघर्ष करायला हवा विशेषतः पत्रकारांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आपली कार्य अधिक जबाबदारी पूर्वक करायला हवे असे मत व्यक्त केले. अँटी पायरेसी सेल्स हे मुख्य तपासी अधिकारी रामजीत गुप्ता यांनी संस्थेच्या प्रत्येक कार्यास आमचा नेहमीच सकारात्मक प्रतिसाद असेल असे आश्वासन दिले. दिग्दर्शक महेश्वर तेटांबे यांनी निस्वार्थी सेवा हीच खरंतर संस्थेच्या यशाचे गमक असल्याचे सांगितले. लेखक, अभिनेता पत्रकार या विविध क्षेत्रांचा व्यासंग असणारे महेश्वर तेटांबे यांनी याप्रसंगी बोलताना, इतरांचा सन्मान करण्याच्या , सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणाऱ्या, कार्यकर्त्यांच्या कार्याची दखल घेणाऱ्या या सन्मान सोहळ्याबद्दल समाधान व्यक्त केले व अशाच प्रकारचे सोहळे इतरही ठिकाणी व्हायला हवेत असे मत व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेचे व्यवस्थापक दीपक ठोकून यांनी याप्रसंगी समाजातील आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नात आमचाही सहभाग असेल असे आश्वासन दिले. उषा हॉस्पिटलिटी चे संचालक अरविंद सुर्वे यांनीही संस्थेच्या प्रत्येक कार्यात आमचा सक्रिय सहभाग असेल असे आश्वासन दिले. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्याख्याते, लेखक आणि समुपदेशक म्हणून प्रसिद्ध असणारे डॉक्टर महेश अभ्यंकर यांनी याप्रसंगी बोलताना समाजातील आरोग्य विषयक समस्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करण्याचा सल्ला दिला . नियमित व्यायाम, संतुलित आहार, शांत सुदृढ मन हे आरोग्यमय आनंदी जीवनाचे महत्त्वाचे आधार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर वाचन संस्कृती वाढवणे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक असल्याचे मग त्यांनी व्यक्त केले व संस्थेने यासाठी पुढाकार घ्यावा, त्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन त्याने संस्थेला दिले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बदलापूर शहरात कार्यरत असणाऱ्या सिटीजन वेल्फेअर- असोसिएशन या नागरी संस्थेच्या राजेंद्र नरसाळे, सुहास सावंत, डॉ. अमित कुमार गोविलकर,विलास हंकारे. सुवर्णा इस्वलकर, मंगेश सावंत, आनंद तेंडुलकर, किशोर गुरव इत्यादी पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा, तसेच पर्यावरण प्रेमी नानाजी देशमुख यांसारख्या समाज रत्नांचा संस्थेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमातील सूत्रसंचालन महेश सावंत सर यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन जनजागृती सेवा संस्थेचे खजिनदार दत्ता कडूलकर यांनी केले. आपल्या सर्वांच्या सहकार्याने संस्थेची वाटचाल सुरू आहे आणि अशाच पद्धतीने समाजोपयोगी सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबवले जातील असे आश्वासन देतानाच आपल्यासारख्या जबाबदार जागरूक नागरिकांनी या संस्थेच्या कार्यात हातभार लावावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शुभंम नेटके, सार्थक भंडारी, गंधाली तिरपणकर,तेजल उकार्डे, सौरभ टकले, उत्तम नेटके, सुषमा नेटके, समर्थ भंडारी, अमिषा नेटके, श्रुती उरणकर यांनी विशेष परिश्रम घेतले यांच्या अविरत मेहनतीमुळे आजचा हा कार्यक्रम संपन्न झाल्याचे मत कडुलकर यांनी व्यक्त केले .