महाराष्ट्र अक्षर मानव संघटनेचे राज्य कार्यवाह, आझाद खान यांनी केली घोषणा.
अक्षर मानव संघटनेकडून साहित्य, समाज, आरोग्य, शिक्षण, कला, पर्यावरण, विज्ञान अश्या मानवी जगण्याच्या 70 (सत्तर) अधिक विषयात काम करते. सुप्रसिद्ध मराठी लेखक कथा कादंबरीकार, ज्येष्ठ विचारवंत राजन खान यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना जगभर चालते.
अक्षर मानव संघटनेच्या अमरावती शिक्षण विभाग अध्यक्षपदी सामाजिक परिवर्तनवादी आणि मानवतावादी विचार सारणीचे जिल्हा परिषद मध्ये मुख्याध्यापक या पदावर सध्या कार्यरत असलेले बडनेरा येथे राहणाऱ्या राजेश डहाके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा अक्षर मानवचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. प्रविण जावळे, उपाध्यक्ष प्रा. योग गुरू दिपेश मोहिते यांच्या परवानगीने महाराष्ट्राचे राज्य कार्यवाह आझाद खान यांनी ही घोषणा अमरावती मध्ये केली.
शिक्षक असलेले श्री राजेश डहाके यांची ही नियुक्ती केवळ एक पद नाही तर संपूर्ण अमरावती जिल्हात समाज, साहित्य, शिक्षण आणि मानवी हक्कांसाठी नव्या जोमाने कार्य करण्याची खूप मोठी संधी आहे. शिक्षण हा जगण्यातला अविभाज्य घटक आहे. शिक्षण अभ्रष्ट साधनांसह प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहचले पाहिजे. शिक्षणाचा हा शुद्ध प्रवाह पोहचवण्याचं काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अडचणी, समस्या, त्यांचं माणूसपण हे सगळं जपत शिक्षण व्यवस्था आणखी कशी बळकट आणि सक्षम करता येईल यासाठी अक्षर मानव संघटनेचा हा शिक्षण विभाग अमरावती मध्ये सतत कार्यरत राहील. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात असे विभाग अध्यक्ष कार्यरत आहेत. असे या नियुक्तीच्या छोट्या खाणी कार्यक्रमात अक्षर मानवचे राज्य कार्यवाह तथा विदर्भाचे पालकमंत्री आझाद खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
अक्षर मानव एक विचारधारा नसून ती एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची व्यापक चळवळ आहे. जी संपुर्ण समाजाच्या प्रबोधनासाठी कार्यरत आहे. राजेश डहाके यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण अमरावती जिल्ह्यात अक्षर मानव शिक्षण विभागात त्यांच्या अनुभवाने अधिक बळकटी मिळेल. अशी भावना राज्याचे सर्व मुख्य पदाधिकारींनी व्यक्त केली.
अमरावती जिल्हा कार्यकारिणीच्या सचिव अश्विनी वितोंडे यांनी या प्रसंगी शुभेच्छा देतांना म्हटले की डहाके सरांच्या या नियुक्तीने अक्षर मानवच्या अमरावती शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक कार्यास नवी दिशा मिळेल.
अक्षर मानव शिक्षण संमेलन, अक्षर मानव बाल विद्यार्थी संमेलन” संपुर्ण भारतात वेगवेगळ्या तसेच राज्यात ,जिल्ह्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, लेखक, विद्यार्थी, आरोग्य क्षेत्रातील मंडळी तसेच शिक्षण प्रेमींना या चळवळीत सहभाग करून घेऊ. देशोदेशीच्या शिक्षण पद्धती, मोफत शिक्षण, शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण, देशातले शिक्षणातले अभिनव प्रयोग, भेदरहित आणि दैवीकरणापासून वेगळया शाळा, गरिबी आणि संमेलन यांची सांगड, शिक्षण आणि संस्कार, पुस्तकी ज्ञान आणि कौशल्य शिक्षण, शिक्षकांची अवांतर कामे आणि कौटुंबिक सुख, अध्यावत शिक्षक, मुलांची लैंगिकता, मुलांच्या मेंदूच्या विकासाचे अनेक प्रयोग आणि व्यावसायिक शिक्षण अशा विषयावर तोडग्यासह चर्चा, अक्षर मानव शिक्षण विभागात सखोल अनेक उपक्रम देशभर राबवु. अजिंक्य किन्हिकर अध्यक्ष, अक्षर मानव संघटना, भारत.