Gavakadachi Batmi network
महाराष्ट्र, चंद्रपूर : विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश वरोरा यांच्या न्यायालयात महाबोधी महाविहार बुद्धगया प्रकरणात सुरुवातीची सुनावणी आज संपन्न झाली असून दिनांक १८/०६/२०२५रोजी आदेशाकरीता प्रकरण ठेवले आहे.
फौजदारी खटला क्रमांक ०९/२०२५ असुन आँनलाईन उपलब्ध आहे.विनोद खोब्रागडे यांनीच जबरदस्त आर्गुमेंन्ट करुन,अट्रासिटीचा कलम ३(१)(न) व ४ ,१८ क सह,भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चा कलमानुसार बिहार राज्याचे मुख्यमंत्री नितीशकुमार,मुख्य सचिव अमृतलाल मिना,जिल्हाधिकारी डॉ.एस.एम.त्यागराजन,महंत आणि इतर दोषी कसे आहेत.? याबाबत संपूर्ण वस्तुस्थिती समजावून सांगितली आणि माननीय सुप्रीम न्यायालयाचे जजमेंट तसेच उच्च न्यायालयाचे जजमेंट सह दाखल करुन अट्रासिटीचा कलमानुसार त्यांच्यावर FIR दाखल करण्याची मागणी केली आहे.
बिहार सरकार व मुख्यमंत्री नितीशकुमार,मुख्य सचिव मीना, जिल्हाधिकारी त्यागराजन गया व महंत पुजारी विरुद्ध अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी खटला चंद्रपूर जिल्हातंर्गत वरोरा जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाला आहे.
विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश वरोरा यांच्या न्यायालयात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार व इतर यांच्या विरुद्ध अट्रासिटीचा फौजदारी खटल्याची आज दिनांक ०४/०६/२०२५ रोजी सुनावणी झाली आहे.प्रकरण दिनांक १८/०६/२०२५ रोजी आदेशाकरीता ठेवले आहे.
आकाश लामा यांचा सांगण्यावरून गया येथील पोलिस अधीक्षक व ठाणेदार यांनी भंते विनयचार्य यांना अनेक कलमानुसार विनाकारण बोगस FIR दाखल करुन जेल मध्ये टाकले व पोलिस प्रशासन यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केला.यामुळे त्यांचावर सुद्धा FIR दाखल करण्याची मागणी आज न्यायालयात केली आहे.
समाजाकडून एक रूपया सुद्धा दान न मागता,कुठलेही आंदोलन,मोर्चा न काढता भारतीय नागरिक म्हणून भारतीय संविधानीक मार्गानेच,महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त करण्यासाठी व दोषींवर फौजदारी कारवाई साठी न्याय व हक्कासाठी हा खटला दाखल केला आहे असे विनोद खोब्रागडे यांचे म्हणणे आहे.
विनोद खोब्रागडे यांनी प्रथमतः राष्ट्रपती भारत सरकार यांना गंभीर तक्रार केली.नंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना गंभीर तक्रार केली,तद्वतच शासन प्रशासन यांना गंभीर तक्रार केली.त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला आहे.
कायद्याच्या माध्यमातून गेले तर तुमच्या केसालाही धक्का भारतीय संविधान लागु देत नाही असे फिर्यादी विनोदकुमार खोब्रागडे यांचे म्हणणे आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तींबाबत भारतातील,जगातील हा पहिलाच अट्रासिटीचा फौजदारी खटला असल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे या खटल्याकडे लागले आहे.
भारतीय संविधानाच्या विसंगत महाबोधी महाविहार टेंपल कायदा ७५ वर्षांपासून आजही कसा काय लागु आहे.? आणि महाबोधी महाविहार बुद्धगया येथे पिंडदान करणे कसे काय सुरु आहे.?
बौद्ध पौर्णिमाच्या दिवशी माहामहीम राज्यपाल,बिहार सरकार हे शिवलिंगची पुजा महाबोधी महाविहार बुद्धगया येथे कसे काय करतात आणि हे प्रोटोकॉल मध्ये येते काय.?
तथागत गौतम बुद्धाचे पाच शिष्य यांना पाच पांडव कसे काय दाखवतात.?
महाबोधी महाविहार बुद्धगया परिसरात गैर हिंदू चे मंदिर,मस्जिद कसे आहेत.?
असे गंभीर स्वरूपाचे प्रश्न उपस्थित महाबोधी महाविहार बुद्धगया येथील बोगस व विसंगत समिती तात्काळ बरखास्त करून बौद्धांच्या ताब्यात द्यावे अशी मागणी विनोद खोब्रागडे यांनी केली आहे.
ज्याअर्थी अनुसूचित जाती जमाती चे लोक ज्याला पवित्र किंवा अत्यंत आदरणीय समजतात त्या कोणत्याही वस्तुला उद्ध्वस्त करणे,नुकसान पोहचविणे किंवा खराब करणे,हा अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ सुधारणा २०१६ चां कलम ३(१)(न) नुसार “दखलपात्र” गुन्हा आहे.
भारतात अनेक तज्ञ वकिल मंडळी होते व आहेत,लोकप्रतिनिधी आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत,सेवानिवृत्ती झालेले IAS,IPS, अधिकारी होते व आहेत,एकानेही अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी खटला दाखल केला नाही,फक्त फोकनाड भाषणे देतात,आंदोलन व मोर्चा द्वारे निषेध नोंदवून निवेदन देतात आणि फोटो काढून पेपरला बातम्या देऊन प्रसिद्धी मिळवून घेतात व दुसऱ्या दिवशी चुपचाप घरात बसतात,ही शोकांतिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.कायद्याच्या पुढे सर्व समान आहेत.भारतात फक्त संघर्षी विनोदकुमार खोब्रागडे सामाजिक कार्यकर्ते वरोरा,जिल्हा चंद्रपूर यांनीच अट्रासिटीचा कलमानुसार फौजदारी पीटिशन दाखल केली आहे. जर भारतातील ८०० जिल्ह्यातुन शेकडो फौजदारी पीटिशन,सुप्रीम कोर्टात,उच्च न्यायालयात,जिल्हा व सत्र न्यायालयात,जनहित याचिका,स्पेशल लिव्ह पीटिशन,फौजदारी खटला दाखल झाले असते तर आठ दिवसांत महाबोधी महाविहार बुद्धगया मुक्त झाले असते असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार डोक्यात घ्या,अंमलबजावणी करा,कधिच अपयश येत नाही हा माझा ३० वर्षांचा अनुभव आहे,म्हणून अधिकार वानीने सर्व जनतेला सांगतो आहे असे त्यांनी म्हटले आहे.
Tags : #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #पर्यावरण #Konkan, #प्रदुषण, #स्वच्छभारत, #सुंदरभारत, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana, #up, #जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, #police , #Indianarmy, #cm, #MP, #MLA, #ChiefMinister, #PrimeMinister,#President, #Agriculture, #Farmers, #Corruption, #Injustice, #Atrocities, #खासदार, #आमदार, #मुख्यमंत्री, #पंतप्रधान, #राष्ट्रपती, #किसान, #शेतकरी, #मित्र,#शिवसेना, #मनसे, #बसपा, #वंचित,#भाजपा, #कांग्रेस, #bjp, #congress, #shivsena, #mns, #bsp, #RPI, #rti, #RighttoInformation, #humanrights, #ncp, #commission for women, #crime,#सीबीआय, #cid, #ed, #RTO, #राष्ट्रवादी, #environment , #chandrapur, #Vinodkhobragade, #bihar, GavakadachiBatmi.com.