अमरावती मध्ये राज्य स्तरीय आरोग्यशास्त्र व आहारशास्त्रावर एक दिवशीय शिबिर थाटात संपन्न.

 

Health Camp,


 झांसी च्या राणी लक्ष्मीबाई यांचे साहवे वंशज  वैभव साठे यांची शिबिरा मध्ये विशेष मार्गदर्शन 




अमरावती करांचा शिबिराला प्रचंड प्रतिसाद


अमरावती:- प्रत्येकाला वाटते आपण आणि आपल कुटुंब निरोगी राहीलं पाहिजे. परंतु बदलत्या जीवनशैलीमुळे मनुष्याची आहार पद्धती बदलली आहे. यामुळे माणसाला वेगवेगळे आजार जडू लागले आहेत. आरोग्यशास्त्र व आहारशास्त्र या बाबतीत योग्य माहिती लोकांना समजावी म्हणून 'WOW अकादमीचे फ्रेन्ड्स क्लब अमरावती' यांच्या वतीने अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती येथे रविवार दिनांक 1 जुन 2025 रोजी एक दिवशीय राज्य स्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वीरांगना झांसी च्या रानी लक्ष्मीबाई यांचे सहावे वंशज, मर्मथेरपी, नाडी परिक्षण तसेच उपवास आणि अन्न औषध संशोधक आहार तज्ज्ञ योग गुरू, जागतिक व्याख्याते वैभव साठे हे इंदौर वरुन अमरावती करांना मार्गदर्शन करायला आले होते.



 आज समाजात प्रत्येक घरात कुठल्या न कुठल्या आजाराने प्रवेश केलेला आहे. शुगर , बि. पी. , अस्थमा, संधिवात, थाॅयराईड, डोळ्यांचे आजार, किडनीचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, पायदुखी, कंबरदुखी, गर्भाशयाचे आजार, दातदुखी, मनकेदुखी, किडनीचे विकार, सिकलसेल पासून तर कॅन्सर सारख्या दुर्धर आजारा पर्यंत आपल्याला लांब कसं राहता येईल खास आपल्या शैलीत दादांनी समजावुन सांगितलें. भारतात आणि भारताबाहेरील व्यक्तीचे‌ आरोग्य विषयक जीवन दुरुस्त कसे होतिल या साठी आंतरराष्ट्रीय शिबिर मी सतत घेत राहतो. आपण आपल्या आहारात फक्त जेवन बदलवून आपल्याला दवाखाने नेहमी साठी बंद करता येईल. गोळ्या औषधी आयुष्यभरा साठी बंद होतील. आपल्याला आयुष्य जगण्याचा आनंद घेता येईल. आपल्या घरच्या आहाराला व पाण्यालाच औषध म्हणून कसं वापरता येईल. यावर प्रामुख्याने वैभव साठे यांनी एकंदरीत सविस्तर व सखोल मार्गदर्शन केले. अनेक मर्मथेरपी व्यासपीठावर प्रयोग करून दाखवले व ज्यांची थेरेपी केली ते सर्व जन आपले चश्मे काढून वाचु शकत होते. पाहु शकत होते. असे एक ना अनेक प्रयोग व्यासपीठावर वैभव साठेनीं अमरावती करांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवले. अमरावतीकर टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला उत्फुर्द प्रतिसाद देत होते. 


सुर्य नाडी, चंद्र नाडी, जल चिकित्सा, भारतीय योग, मर्मथेरपी,अशा एक ना अनेक विषयांवर या एक दिवसीय शिबीर मध्ये दिवसभर मार्गदर्शन चालले. या वेळेस पहिल्यांदा अमरावती मध्ये झांसी च्या महाराणी लक्ष्मीबाई यांचे साहवे वंशज वैभव साठे पहिल्यांदा आले असता अनेक लोकांनी त्यांच्या सोबत फोटो काढायला प्रचंड गर्दी केली होती. दादांनी शांततेत सर्वांना वेळ देवून फोटो काढले. शिबिराचा लाभ घेण्यासाठी अनेक लोक महाराष्ट्र भरातुन आलें होतें. अनेक संघटनांनी त्यांचे अमरावती मध्ये स्वागत केले. यात प्रामुख्याने महाराष्ट्र अक्षर मानव संघटनेचे राज्य कार्यवाह तथा विदर्भाचे पालकमंत्री  आझाद जमा खान यांनी प्रामुख्याने वैभव साठे भेटुन संघटने साठी वेळ मागितला. तसेच हे शिबिर संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात कसे घेता येईल असे ओरोग्य शिबिर आपण घेऊ असे मत अक्षर मानव संघटनेचे राज्य कार्यवाह तथा विदर्भाचे पालकमंत्री आझाद खान यांनी आपले मत व्यक्त केले. 

वैभव साठे यांनी सभागृहात कुणालाही नकार दिला नाही शांत पणे सर्वांना एकुण घेतले व्यक्तिगत भेटले सुध्दा. प्रत्येक व्यक्तीला भेटुन आरोग्य बाबत ते विचारपूस करतांना दिसले 

या शिबिराला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. सभागृहात शेवट पर्यंत अमरावतीकर आपल्या खुर्चीत बसून गंभीरपणे सर्व समजून घेत होते. अमरावती करांचा उत्साह पाहता वैभव साठे यांनी आयोजकांना व्यासपीठावरुन सुचना करून सांगितले की असे शिबिर एका दिवसात होत नाही. पुढच्या वेळेस तुम्ही दोन किंवा तीन दिवशी निवासी शिबिर घ्या मी वेळ काढून इथे येईल हि अमरावती करांन साठी खूप मोठी जमेची बाजू आहे. या‌ वेळेस इंदौर वरुन मोहनलाल राठोड हे सुद्धा उपस्थित होते यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. अमरावती करानं सोबत संवाद साधला.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी कोकाटे तर आभारप्रदर्शन किर्ती दहातोंडे यांनी केले. 

अमरावती वासियांना या शिबिराचा खूप लाभ झाला असे मत आलेल्या नागरिकांनी आपले मत व्यक्त केले. असे शिबिर वारंवार व्हावे शिबिरात सहभागी झालेल्या लोकांना आमच्या कडे प्रतिक्रिया दिल्या पुढच्या वेळेस 'दोन दिवशीय निवासी शिबिर' अमरावती मध्ये लवकरच घेऊ तसेच वैभव दादांना नेहमीसाठी अमरावतीकरानं सोबत जोडुन ठेवु असे आयोजक समितीच्या कार्याध्यक्ष सारिका शिवाजी कोकाटे यांनी माहिती दिली. 

 या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आझाद खान, शिवाजी कोकाटे, सारिका कोकाटे, राहुल दहातोंडे, किर्ती दहातोंडे, साकेत ठाकुर,अश्विनी वितोंडे-खान, भुषण साबळे, भावना काळे, अमोल भोजने, सुचिता भोजने, किशोर आमले, मुकुंद भक्ते, पुजा भक्ते, मंगेश मानकर, श्रद्धा मानकर, अशोकरावजी जीवरकर, स्वाती बहेकर, आदींनी परिश्रम घेतले.








Post a Comment

Previous Post Next Post