रासायनिक खतांची भरमसाठ दरवाढ आणि डीएपी-युरिया खताची टंचाई शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

Department of Agriculture, Agricultural Center,


 Farmers, agriculture news, agriculture department, village news, village friends, agriculture friends, GavakadachiBatmi 


Anil bangale, nanded Maharashtra


किनवट : तालुक्यात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पेरणीची लगबग सुरू केली आहे. मात्र, या काळातच रासायनिक खतांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने आणि खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे.

दरवाढीचा फटका

"10:26:26" या खताची किंमत तब्बल २५० रुपयांनी, "15:15:15" व "14:35:40" या खतांची किंमत १०० रुपयांनी, तर "20:20:0:13" खताची किंमत १५० रुपयांनी वाढली आहे. या दरवाढीमुळे पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढणार असून, शेतीच्या एकूण आर्थिक गणितावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कृत्रिम टंचाईचा संशय

सध्या तालुक्यातील अनेक ठिकाणी डीएपी व युरिया खते सहज उपलब्ध नसून, काही ठोक विक्रेत्यांनी साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण केली असल्याची शंका शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.

विक्रेत्यांची अरेरावी

काही कृषी केंद्रधारक विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना स्पष्टपणे सांगितले आहे की, "डीएपी अथवा युरिया हवे असल्यास इतर बियाणे व कीडनाशके घेणे बंधनकारक आहे." अशा अटींमुळे शेतकऱ्यांवर अनावश्यक खर्चाचा भार पडत असून खत खरेदी करताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शेतकऱ्यांची मागणी

अशा अरेरावी करणाऱ्या विक्रेत्यांवर कृषी विभागाने तात्काळ कारवाई करावी, त्यांच्या परवाने रद्द करावेत व खतांचा पुरवठा सुरळीत करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. कोणतीही अट न घालता आवश्यक खते सहज उपलब्ध करून देण्यात यावीत, अशीही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post