महापुरुषांच्या संयुक्त जयंती उत्सवाचा कार्यक्रम वातावरण बदलामुळे स्थगित - अॅड. ताजणे

 

Maharashtra India GavakadachiBatmi

            सहायक संपादक कैलास बनसोड 

वाशिम शहरात चलो बुद्ध की ओर या अभियानांतर्गत २५ मे २०२५ रोजी थोर महामानव तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या संयुक्त जयंती उत्सवाचे भव्य आयोजन नालंदा नगर येथील फुले - आंबेडकर मैदान येथे सायंकाळी ४ वा. करण्यात आले होते . परंतु हवामानातील बदल व अवकाळी पावसाची शक्यता असल्याने सदरील कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सदरील कार्यक्रमाची संभाव्य तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती

कार्यक्रमाचे आयोजक अॅड. संदीप ताजने यांनी दिली. यावेळी कार्यक्रम संस्थगीत करावे लागल्या बद्दल त्यांनी दिलगीरी व्यक्त केली. शेवटी निसर्गाच्या समोर कुणाला ही जाता येत नाही. हाच कार्यक्रम कोणत्याही बदला शिवाय लवकरच घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post