किनवट : तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दुर्बल दिव्यांग विधवा वयोवृद्ध घटकातील महिला पुरुषांना शासनातर्फे दीड हजार रुपये मानधन देण्याची शासनाची योजना या दुर्बल घटकासाठी संजीवनीच आहे परंतु किनवट तहसील कार्यालयातील नव्याने प्रस्ताव सादर केलेले माहे फेब्रुवारी मार्च एप्रिल महिन्याच्या प्रस्तावाची तहसील स्तरावरील प्रक्रिया पूर्ण पार पडली आहे परंतु गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट हा एक शासनाचा प्रतिनिधी म्हणून या समितीचा सदस्य आहे आणि आणि गटविकास अधिकारी किनवट यांची सही सर्व प्रस्तावावर झाल्यानंतर अनुदानाचा हप्ता संबंधित नवीन लाभधारकांच्या खात्यावर वर्ग केला जातो परंतु गटविकास अधिकारी पंचायत समिती किनवट हे पद रिक्त असल्याने सध्या प्रभारी म्हणून माहूर पंचायत समितीचे कांबळे यांच्याकडे आहे. आणि मार्च एंड चा सध्या पिरेड असल्याने गरीब दुर्बल विधवा दिव्यांग व्यक्तीच्या फाईलवर सह्या करण्यासाठी सध्या तरी वेळ मिळत नसेल असेच म्हणावे लागेल. मात्र संजय गांधी निराधार योजनेचे नव्याने प्रस्ताव सादर केलेले लाभार्थी तहसील भोवती चकरा मारत असल्याचे आज प्रत्यक्ष प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष भगवान मारपवार यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
दिव्यांगासाठी आठ ते दहा तास ते सतत काम करीत असतात तहसील स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण पार पडली असेही भगवान मारपवार म्हणाले.