किनवट : प्रधानसांगवी ते बेंदी जाणार्या वादग्रस्त रस्ता प्रकरणाची २३ मे रोजी किनवटच्या तहसिल कार्यालयात सुनावणी पार पडली असून,"सस्ती अदालत" पार पडलेल्या सुनावनीत नांदेडच्या अपर जिल्हाधिकार्यांच्याच निर्णयालाच कायम ठेऊन रस्ता तयार करण्यावर प्रशासन पोहोचले. परंतू परंपरागत वहिवाट रस्त्याच्या रेकार्डला प्रशासनाने विचारात घेतले नसल्याने अन्यायग्रस्त शेतकर्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अतीक्रमीत केलेला मूळ रस्ता खुल्ला करण्याऐवजी दुसर्या शेतकर्याच्या हद्दीतून रस्त्याचा घाट घातला जाणार असल्याचे समजते."सस्ती अदालत" मधिल तहसिलदारांचा निर्णय अन्यायग्रस्त शेतकर्याला अमान्य असल्यास याही निर्णयाला वरीष्ठांकडे दाद मागण्यासाठी अपिल करण्याच्या हालचाली ऐकायला मिळू लागल्या आहेत.
मागिल महिन्यात नायब तहसिलदारांच्या पथकाच्या कामात अडथळा आणणार्याविरुद्ध तहसिलदारांनी कारवाई करणे अपेक्षीत होते मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेत भूमापन क्र.५३ मधूनच गाव नकाशासह अन्य रेकार्डवर नोंद असलेला ग्रामिण गाडीमार्ग (पोटखराब) वहिवाट गाडीरस्ता २०१४ पासून बंद केल्याचे प्रकरण आहे. १९६३ मध्ये गाव नकाशासह अन्य अभिलेख्यासह प्रतीबुकातही सदरहू रस्त्याची नोंद असतांनासुद्धा आम रस्ता अतिक्रमीत केल्याचा परिनाम लोकांना भोगावा लागत असल्याच्या प्रतिक्रीया ऐकायला मिळू लागल्या आहेत.
मौजे बेंदी शिवारातील शेत भूमापन क्र.५३ मधून पुर्वापारपासून गाडीमार्ग असल्याची याच भूमापन क्रमांकाच्या दस्तनोंदनीत नोंद रेखाटली असल्याची तक्रारीत नोंद आहे. चतु:सिमेच्या उत्तरेस सरकारी पांदणरस्ता असल्याची १९८९ खरेदीखतात नोंद दर्शवली असल्याचेही नमूद आहे. १९६३ मधील प्रतीबुकाच्या नकलेत गाडीमार्गाची सूर्यप्रकाशा एवढी स्वच्छ नोंद असतांनाही जुना रस्ता खुल्ला करण्यासाठी तहसिल प्रशासन निर्णय घेत नसल्याने आश्चर्य आणि खंतही व्यक्त केली जात असल्याचे चित्र पहायला मिळाले.
तहसिलदारांकडे १६ आँक्टोबर रोजी रस्ता खुल्ला करण्यासाठी तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन नायब तहसिलदारांना रस्ता चालू करण्याचे आदेश दिले होते मात्र त्याचा कांहीच अर्थ झाला नाही. "सस्ती अदालत"मधून न्यायाची अपेक्षा होती मात्र शेतकर्यांसह लोकांच्या हाती निराशाच आली. "सस्ती अदालत"मधिल निर्णयाला अपिलीय आव्हान देण्याची शक्यता व्यक्तविली जात आहे. निर्णय लागेल तेंव्हा लागेल मात्र तोपर्यंत गरजुंना या रस्त्यापासून वंचित राहावे लागणार असल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे.