अखिल भारतीय किसान सभा माहूर तालुका कमिटीच्या वतीने तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा #AIKS

 

अखिल भारतीय किसान सभा


"सोमवार दि.०२ जुन २०२५ अखिल भारतीय किसान सभा माहूर तालुका कमिटीच्या वतीने तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा " 


Anil bangale


नांदेड,माहुर :- देशात व राज्यात सवेवर आलेल्या धर्माध मनुवादी कॉरपोरेट धार्जीण्या, जनविरोधी भाजप व मित्रपक्षाच्या शेतकरी, श्रमिक विरोधी धोरणांचा परिनाम म्हनुन देशभरातील कृषी अरिए आनखी तीव्र होत आहे.१९९१ साली तात्कालीन कांग्रेस प्रणीत सरकारने देशात कॉरपोरेट धारर्जीण्या नवउदारवादी धोरणांचा स्वीकार करून देशात कृर्षी अरिष्टाला जन्म दिला २०१४ सालापासुन सत्तेवर आलेल्या भाजप प्रणित मोदी सरकारने या धोरणांधी अधिक तीव्रतेने आमलबजावनी केल्याने कृषी संकट अधिक भेसुर बनले आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांन मध्ये मोठी वाढ झाली असुन. सरकारकडून एकिकडे शेतकरी विरोधी धोरणे राबविली जात आहे. व दुसरीकडे शेतीचा उत्पादन खर्च याउवला जात असुन शेतीमालाचे भाव सतत पाडले जात आहे. त्यामुळे शेतकरी भेटाकुटीला आलेला आहे.


विधानसभा निवडणूकी पुर्वी महायुतीने सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येऊन सहामहिने लोटले असले तरी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात आले. नाही उलट बैंक प्रसासना मार्फत शेतकऱ्यांना नोटीसा पाठवून खाते होल्ड करून जखमेवर मिठ चोळण्याचे काम करित आहे. आदिवासी व वननिवासी वरिल ऎतिहासीक अन्याय दूर करण्यासाठी डाव्या पक्षाच्या खासदारांच्या दवावामुळे सरकारला २००६ मध्ये वनाधिकार कायदा मंजुर करावा लागला २००८ मध्ये कायद्याची अमलबजावनी सुरू झाली. मात्र अंमलबजावनीला १७ वर्ष होत असले तरी अद्यापही अदिवासी व वन निवासींना पुरेसा न्याय मिळालेला नाही.


महाराष्ट्रात हजारो हेक्टर देवस्थान जमिन कसणारे शेतकरी आहेत परंतु महाराष्ट्र सरकारने या जमिनी बाबत कोणताही ठोस कायदा न केल्याच्या परिणामी प्रशासन काही परिपत्रकाबा चुकीचा अर्थ काढत जमिन कसणाऱ्या शेतकऱ्यांना कागदोपत्री उपरे ठरवित आहे. शेतकऱ्यांची कायम स्वरूपी मालकी ठरविण्यासाठी कायदा करण्याची आणि तो आमलात येण्याची गरज आहे.


महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रांनी निवडणुकी पुर्वी मोठ्या प्रमाणात होणारे विस्थापन टाळून विमटा धरण करून बॅरेजस बांधण्याचे आश्वासन दिले होते परंतु त्या आश्वासनाला बगल देत गरज नसतांना हजारो हेक्टर सुपीक जमीन पाण्यात बुडवून लाखो शेतकऱ्यांना पाण्यात बुडविण्याचे पाप करित आहे.


गेली अनेक वर्षापासुन अखिल भारतीय किसान सभा शेती आणि शेतकरी वाचविण्यासाठी सतत संघर्ष करीत असुन येणारा काळ हा शेती आणि शेतकऱ्यासाठी वाईट येणार आहे. तेव्हा २ जनु रोजी होणाऱ्या भव्य मोर्चात हजारोच्या संख्येने सामीन व्हावे असे नम्र आवाहन.


मागण्या :


१) देवस्थान जमिन, वनजमिन, गायरान जमिन कसनाऱ्यांच्या नावे करा व देवस्थान जमिन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबारा वरिल बेकादेशीर हटविलेल्या नोंदी पुर्वरत करा.


२) चिमटा धरण रद्द करून बॅरेजेस बांधा.


३) शेतकऱ्यांचे संपुर्ण कर्जमाफ करा व नव्याने पिक कर्जाचे वाटप करा व शेतकन्यांच्या खात्यात लावलेले होल्ड ताबडतोब काढून खाते पुर्ववत चालु करा.


४) शेतकऱ्यांचे संपुर्ण विज बिल माफ करा व २४ तास उच्च दावाजी लाईट पुरवा.


५) मान्सुनपुर्व झालेल्या पावसाने रबि पिकांच्या नुकसाणीचे पंचनामे करा व आपतीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा.


६) निराधारांच्या पेन्शन मध्ये ५०००/- रूपये पर्यंत वाढ करा व दरमहा वेळेवर पेन्शन द्या.


७) चार श्रम सहिंता रद्द करा. व आशा, गटप्रर्वतक, अंगनवाडी, शालेय आहार कर्मचाऱ्यांना किमान वेनत लागु करा.


८) बोगस बियाण्यांना आळा घाला. व बोगस बियाणे विक्रेत्यावर कार्यवाही करा.


९) बांधकाम कामगारांना नोंदणीसाठी ग्रामविकास अधिकारी यांचे कडून ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र द्या.


१०) लोकशाही विरोधी जन सुरक्षा विधेयक मागे घ्या.


११) सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत होत असलेल्या ररत्यांची व पुलाच्या बोगस कामाची चौकशी करून संबंधीत गुत्तेदारास व त्यांना पाटीसी घालणारे अभियंता व मुख्य अभियंता यांचेवर फौजदारी गुन्हे दाखल करा.


१२) गोकुळ ते पैनगंगा रस्ता करून नदिवर पुल व बंधारा बांधा व तालुक्यातील गावांना जोडणारे नादुरूस्त पुल तोबडतोब दुरूस्त करा.

या मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे. अशे आवाहन काॅ.शंकर सिडाम, काॅ किशोर पवार अखिल भारतीय किसान सभा तालुका समिती माहुर यांनी केले आहे..


विनित : कॉ. डॉ. बाबा डाखोरे, कॉ. अमोल आडे, कॉ. संजय मानकर, कॉ. राजकुमार पडलवार, कॉ. प्रल्हाद चव्हाण, कॉ. प्रसराम पारडे, कॉ. कादर खॉन, कॉ. गागजी मेश्राम, कॉ. दिगांबर आगीरकर, कॉ. कालीदास सोनुले, कॉ. श्रावण जाधव, कॉ. वसंत राठोड, कॉ. शिलाताई ठाकूर, कॉ. सुनिता वाघमारे, कॉ. विनोद डाखोरे, कॉ. शंकर गंदमवार, कॉ. राजु पिसरवार, प्रेमसिंग चव्हाण, किसन दादा जगदाळे, वसंत चव्हाण, ईस्माईल भाई, गणेश जाधव, तारासिंग जाधव, रायभान पिलवंड, बाबाराव फड, भरत वडागुरे, हनमंथु रकेलवार, देवीदास खताले, बद्रीभाऊ जाधव, वसंत कोवे, अनंत महावी, शामराव कुदमेते, परसराम कलाने..


Tags: #गावाकडचीबातमी #जिथेगाव #तिथेआम्ही #गावसहेली #gavsheli, #Latestnews, #village news, #Vidarbha #Marathwada #Khandesh, #शिक्षण, #क्रीडा, #सांस्कृतिक, #ग्रामपंचायत, #मनोरंजन, #Konkan, #Bharat, #Maharashtra, #India, #YouTube, #Google, #fecbook, #instagram, #socialmedia, #digitalmedia, #newsportal, #ija, #Telangana,#up,#जिल्हापरिषद,#जिल्हाधिकारी,#madyapradesh, #UttarPradesh, #DistrictCouncil, #HealthDepartment, #DistrictCollector #Entertainment,#Movies,#GramPanchayat, #PanchayatSamiti, #newstoday, #Jharkhand,#Assam, #Punjab, GavakadachiBatmi.com.  


आजचं आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा..👇

https://www.youtube.com/@gavakadachibatmi

Post a Comment

Previous Post Next Post