गावाकडची बातमी | अतिक्रमण पांदण रस्ता काढण्यास गेलेल्या पथकाला परतावे लागले खाली हात

 




किनवट : प्रधानसांगवीकडून बेंदीकडे जाणारा परंपरागत वहिवाट अतीक्रमीत रस्ता खुल्ला करायला गेलेल्या नायब तहसिलदारांच्या पथकाच्या कामात अडथळा आणल्याने पथकाला खाली हात परतावे लागले. 

दोन शेतकर्‍यांच्या सिमेवरुन नव्हे तर शेत भूमापन क्र.५३ मधूनच गाव नकाशासह अन्य रेकार्डवर नोंद असलेला वहिवाट गाडीरस्ता २०१४ पासून अतीक्रमन करुन नागरीकांचा रस्ता बंद केल्यामुळे दोन गावाचा संपर्क आणि शेतीकडे जाणारा रस्ता रोखण्यात आल्याची गावकर्‍यांची तक्रार आहे. १९६३ मध्ये गाव नकाशासह अन्य अभिलेख्यात आणि उल्लेखनीय म्हणजे त्या शेतीच्या दस्तनोंदनी आणि प्रतीबुकातही सदरहू रस्त्याची नोंद असतांनाही लोकांचा रस्ता बंद क्रेलाय.

    तहसिलदारांच्याच आदेशावरुन रस्ता खुल्ला करायला गेलेल्या पथकाच्या कामात अडथळा आणून तहसिलदारांच्या आदेशाच्या अवमान प्रकरणी संबंधितांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी.

 अशा आशयाची तहसिलदारांकडे तक्रार दाखल केल्याचे प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

     मौजे बेंदी शिवारातील शेत भूमापन क्र.५३ मधून पुर्वापारपासून गाडीमार्ग असल्याची याच भूमापन क्रमांकाच्या दस्तनोंदनीत नोंद रेखाटली असल्याची तक्रारीत नोंद आहे. चतु:सिमेच्या उत्तरेस सरकारी पांदणरस्ता असल्याची १९८९ खरेदीखतात नोंद दर्शवली असल्याचेही नमूद आहे. १९६३ मधील प्रतीबुकाच्या नकलेत गाडीमार्गाची नोंद आहे. अर्थात १९६३ ते २०१४ पर्यंतच्या प्रत्येक रेकार्डमध्ये नोंदी आहेत. तदोपरांत मात्र हळू हळू अतिक्रमन करुन सार्वजनिक रस्ता बंद करुन गावकर्‍यांना वेठीस धरले आहे. यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे यामुद्यावर वैतागलेल्या ग्रामस्थांची मागणी आहे.

      गावकर्‍यांसह शेतकर्‍यांचा आम रस्ताच अतीक्रमन केल्यामुळे किनवटच्या तहसिलदारांकडे १६/आँक्टोबर/२०१४ रोजी रस्ता खुल्ला करण्यासाठी तक्रार दाखल केली. तक्रारीवरुन नायब तहसिलदारांना रस्ता चालू करण्याचे आदेश फर्मावले. परंतू त्याही वेळी अशाच पद्धतीचा अवलंब करुन पथकाच्या कामात अडथळा निर्माण केला असल्याचे तक्रारकर्त्यांचे म्हणने आहे. याच रस्त्यासाठी उपजिल्हाधिकार्‍याकडे ३०/नोव्हेंबर/२०१५ रोजी तक्रार केली. पुन्हा तहसिलदारांनी पथकाला रस्त्यासाठी जायमोक्यावर रस्ता चालू करण्याचे आदेशीत केले परंतू त्याही वेळी पुन्हा अशीच थेरी वापरुन पथकाला खाली हात परतण्यास भाग पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला. ७/मार्च/२०२५ रोजी पुन्हा गावकर्‍यांनी तहसिलदारांकडे तक्रार केली. १६/एप्रिल रोजी नायब तहसिलदार शेख रफीक, भूमी अभिलेख, मंडळ अधिकारी यांचे पथक जायमोक्यावर पोहोचले. ग्रामस्थांचीही संख्या भरपूर होती. याहीवेळी वाद करुन शासकीय कामात अडथळा आणून पथकाविरुद्धच तहसिलदारांकडे तक्रार केल्याचे समजते.






Post a Comment

Previous Post Next Post