अकोली (ता. परतूर) येथील ग्रामपंचायतने विविध विकास कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार करीत वारंवार पत्रव्यवहार करुन देखील अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी जालना जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या आज बुधवारी (दि.१९) तिसऱ्या दिवशी जिल्हा परिषद सीईओंनी अकोली ग्रामपंचायतमधील कारभाराच्या चौकशीसाठी सहा अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेतले आहे.
या विषयी अधिक माहिती अशी की, आष्टी पासून जवळच असलेले अंदाजे १ हजार लोकसंख्येचे गाव असलेल्या अकोली ग्रामपंचायतने सन २०१७ पासून ते आजपर्यंत मातोश्री पांदण रस्ते, नाला पुनर्जीवन, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सिमेंट रस्ते व पेवर ब्लॉक, भूमिगत गटार वैयक्तिक लाभ, शेततळे, सिंचन विहिरी, वैयक्तिक लाभ, पंधरावा वित्त आयोग, जनसुविधा अंतर्गत सिमेंट रस्ते, धनगर वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता, दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ता व इतर योजना, पाणीपुरवठा अंतर्गत टंचाई, स्मशानभूमी एमआरजीएस, एमआरजीएस अंतर्गत अंगणवाडी बांधकाम व प्ले ग्राउंड, दवाखाना अकोली ग्रामपंचायतमधील कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमल्याचे लेखी पत्र अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर ग्रामस्थांनी उपोषण मागे घेतले आहे दुरुस्ती, सांडपाणी व्यवस्थापन, झेडपी स्कुल कंपाउंड व प्लेग्राउंड, सार्वजनिक बांधकाम अंतर्गत झाले रस्ते, जिल्हा परिषद बांधकाम अंतर्गत सिमेंट व डांबर रस्ते, पंचायत समिती व जिल्हा परिषद शेषअंतर्गत झालेली कामे, ग्रामपंचायत अंतर्गत आये पाणी फिल्टर योजना, श्यामाप्रसाद मुखर्जी रूरबन योजने अंतर्गत झालेली कामे, स्टेट दलित वस्ती अंतर्गत झालेली कामे अशा विविध कामे अंदाजित एकूण २३ कोटी ६५ लाख रुपयांच्या या कामांची चौकशी करून संबधित दोषीं लोकप्रतिनिधी व संबंधित अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी अकोली येथील सिध्देश्वर सोळंके, पंजाब देशमुख, रवी भानुसे, ओमकार देशमुख, विकास खुळे, सुधाकर सोळंके हे ग्रामस्थ आमरण उपोषणास बसले आहेत. जोपर्यंत चौकशी सुरु होणार नाही तो पर्यंत आमरण उपोषण मागे घेणार नसल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले होते.
दरम्यान या उपोषणाची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घनसावंगी येथील पंचायत समिती गटविकास अधिकारी समीर जाधव, विस्तार अधिकारी बी. एस. सोनवणे, कृषी विस्तार अधिकारी संदीप कुलकर्णी, जि.प.बा.उप विभाग अंबड येथील उपभियंता उमेश धर्माधिकारी, मग्रारोहयो कक्षाचे सहायक कार्यक्रम अधिकारी समाधान शेळके, तांत्रिक सहाय्यक अनिरुद्ध धांडे या सहा जणांची चौकशी समिती नेमण्यात आल्याचे पत्र उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले आहे. सदरील चौकशी समिती हि आकोली येथे जाऊन तक्रारदार यांच्या समक्ष चौकशी करून तपासणी करणार आहेत. चौकशीचा वस्तुनिष्ठ तपासणी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे.