आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात आदिवासी स्त्रीने पुढे आले पाहिजे- नंदिनी टारपे

 


महिलांनी अन्यायाविरोधात लढण्याचा घेतला निर्णय


मालेगाव : आंध आदिवासी जमातीवरील होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यावर आंध आदिवासी महिला संघटन व चर्चा सत्र मालेगाव जि.वाशिम येथे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा निमित्य आयोजित केले होते.

यावेळी आंध आदिवासी महिलांनी कुठल्याही क्षेत्रात मागे न राहत पुरुषाच्या बरोबरीने काम करावे लागेल आणि आधुनिक युगात प्रत्येक क्षेत्रात आंध आदिवासी स्त्रीने पुढे आले पाहिजे असे आवाहन अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा अकोला आदिवासी प्रकल्प कार्यलयच्या माझी अध्यक्ष नंदिनी टारपे यांनी शनिवारी 1 फेब्रुवारी ज रोजी मालेगाव येथे आंध आदिवासी महिला संघटन व चर्चा सत्र या कार्यक्रमात केले.  

मालेगाव अकोला फाट्यावरील मुंगसाजी नगर कॉलनीत आयोजित आंधआदिवासी महिला संघटनाच्या चर्चा सत्र या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी उप सभापती श्रीमती सु. प्र.घोडे होत्या प्रमुख पाहुणे व मुख्य मार्गदर्शक परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे होत्या.

तसेच ज्योती करवते,किरण लठाड,सूर्यकांता चापे,सीता धंदरे,मंगला ढगे, शशिकला करवते,वंदना लेकुरवाळे,पार्वती लठाड,अनिता व्यवहारे,शालिनी डाकोरे प्रमुख पाहुने उपस्थिती होत्या. या कार्यक्रमासाठी वाशिम अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो आंध समाजाच्या महिला सहभागी झाल्या होत्या.

 आजही आंध आदिवासी समाज दर्या खोऱ्यात वाड्यापाड्यात वास्तव्य करणारी मूळ आदिवासी जमात आजही सर्वांकष विकासापासून कोसो दूर आहे. आदिवासींच्या विकासाच्या बहुतांश योजना कागदोपत्री दर्शविल्या जातात प्रत्यक्षात अत्यंत कमी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचतात.



 आदिवासी जमातीमध्ये वाशीम अकोला बुलढाणा जिल्ह्यात आंध जमात मोठ्या प्रमाणात वास्तव्यात आहे. आपल्या हक्कासाठी आजवर पुरुष मंडळीत लढत होती.आता मात्र आंध जमातीतील थोड्याफार शिकलेल्या सवरलेल्या सामाजिक जाणीव असलेल्या स्त्रियांनी आदिवासी जमातीच्या प्रेरणास्थान असलेल्या राणी दुर्गावती, सोबतच राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आदर्श समोर ठेवून मूळ आदिवासींच्या शासकीय नोकऱ्यातील हक्काच्या जागा नकली आदिवासींनी बळकवण्याविरोधात, त्याचप्रमाणे त्या आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढण्यासाठी या महिलांनी आंध आदिवासी महिला संघटना स्थापन करून पश्चिम विदर्भात जिल्ह्या जिल्ह्यात महिला चर्चासत्राचा धडाकाच चालविला आहे.त्या अनुषंगाने शनिवारी 1फेब्रुवारी मालेगावातील मुंगसाजी नगर कॉलनीत आयोजित चर्चासत्राचा आदिवासी वरील होणाऱ्या अन्याय विरोधात एलगार पुकारण्याचा सूर होता.



अ.भा.आदिवासी विकास परिषदेच्या महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनीताई टारपे यांनी शासकीय नोकरीतील मूळ आदिवासींच्या हक्काच्या जागा नकली आदिवासी बळकावत आहेत. याचा परिणाम आपल्या शिकला सवरल्या मुलावर होत आहे तेव्हा आता पुरुषाप्रमाणे आपणही राणी दुर्गावती प्रमाणे मैदानात उतरले पाहिजे असे आवाहन केले. राष्ट्रीय एकता परिषदेच्या कार्यकर्त्या मंगरूळ पीरच्या मंगलाताई ढगे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटनेत दिलेल्या अधिकाऱ्यांनी प्राप्त असलेल्या हक्कांना संघटित होऊन मिळवले पाहिजे असे सुचविले. वंदनाताई गायकवाड यांनी ह्या चर्चा सत्रामध्ये आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणाच्या सोयी सुविधांच्या साठी शासनाची लढले पाहिजे असे सांगितले. अकोल्याच्या सुनिता ताई वाघमारे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या आदिवासी स्त्रियांसाठी असणाऱ्या योजनांना आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी संघटित होऊन लढा देऊया .तर वनिताताई कोकाटे यांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची अनेक योजना निधी अभावी रखडवून ठेवल्या जात आहेत यासाठी पुढे यावे असे आवाहन केले.

 लेकुरवाळे यांनी महिला संघटनांमध्ये मुला-मुलींना सहभागी करून त्यांना बोलते केले पाहिजे असे सुचविले पार्वतीबाई लठाड यांनी आपण कुटुंबासह गावातील व्यसनाधीनता समूळ नष्ट करण्यासाठी एलगार पुकारला पाहिजे असे आवाहन केले. 

  पातूरच्या अनिता ठाकरे यांनी आम्ही या देशाचे मूळ मालक असताना आम्हाला वनवासी ठरवण्याचा जो घाट रचला जात आहे तो हाणून पाडू या असे सांगितले. प्रिया पवार यांनी अंध आदिवासींमध्ये मुलींच्या उच्च शिक्षणाचे उच्च शिक्षणाचे प्रमाण नगण्य आहे त्याची कारण मीमांसा शोधून त्यावर उपाययोजना केली पाहिजे असेच सुचविले अ.

भा.आदिवासी परिषदेच्या वाशीम महिला जिल्हाध्यक्षा सीताबाई धंदरे यांनी राज्यात वाशिम जिल्ह्यातील आंध आदिवासी महिलांची संघटन शक्ती राज्यात एक नंबर वर ठेवीन असे ठामपणे सांगितले. यावेळी कल्पना शिंदे यांनी प्रत्येक आदिवासीबहुल गावात आदिवासी महिला संघटनेच्या शाखा बांधणी करण्यासाठी कटिबद्ध राहू या असे सांगितले तर शीतल शिंदे यांनी एकजुटता शिका मोठ्या शक्तीने संघटित व्हा आणि हक्कासाठी लढा असे सांगितले.

    तसेच शालिनी डाखोरे, शालिनी ठाकरे, शुभांगी पवार आदी. महिलांनी मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रंजनाताई करवते शारदा चोंडकर, शितल खुळे ,उषा लोखंडे सुनिता साखरकर, मंगला शिंदे, आशा पांडे ,रेखा शिंदे, दुर्गा करवते, सविता तांबारे ,प्रमिला लोखंडे, वनिता इंगळे, रंजना देवकर मीरा इंगळे नंदा नांदे अनिता तिवाले, अलका झळके, लक्ष्मी शेळके वनमाला  मोरे पूजा लठाड, लक्ष्मी भूरकाडे, लिलाबाई चाफे ,सुनंदा झाटे ,शितल खुळे, वैशाली बर्गे ,ताई बेले ,सरस्वती वाघमारे ,आरती जामकर, प्रमिला पवार, सुनिता लोखंडे ,अनिता डाखोरे ,शितल ठाकरे ,वंदना कराळे ,निर्मला वाघमारे सह मालेगाव तालुक्यातील अंध आदिवासी महिला संघटनेच्या समस्त महिलांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले य या चर्चासत्राचे प्रास्ताविक शकुंतला झ्याटे, सूत्रसंचालन मंगला मीरासे व किरण लठाड, तर आभार प्रदर्शन रंजना करवते यांनी केले.




Post a Comment

Previous Post Next Post