संस्कृती संवर्धन फाउंडेशनतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..!

 




डोंबिवली(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)

दि.२ फेब्रुवारी २०२५ रोजी समाजातील गरजू आणि निराधार मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी संस्कृती संवर्धन फाउंडेशनने सामाजिक उपक्रम राबवत डोंबिवली येथील अंकुर बाल विकास केंद्र आश्रमातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पेन, पेन्सिल यांसारख्या गरजेच्या वस्तू प्रदान करण्यात आल्या. या वितरण कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मुलांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाची आणि नैतिक मूल्यांची महत्त्वाची जाणीव करून दिली. संस्थेच्या अध्यक्ष अ‍ॅड.रणधीर सकपाळ यांनी सांगितले की, "समाजातील प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे आणि त्यांची प्रगती साधण्यासाठी आवश्यक मदत मिळावी, हा आमचा उद्देश आहे. भविष्यातही असे उपक्रम संस्थेच्या वतीने सातत्याने राबवले जातील." या कार्यक्रमाला मनसेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष दिप्तेश नाईक,संस्थेचे सचिव,रॉकी हिंदुस्थानी, अ‍ॅड. प्राजक्ता उतेकर, अ‍ॅड.भावना सोनवणे,अ‍ॅड.हर्षल वाघ,सुधीर सकपाळ, विनायक चिंदरकर, पूनम जाधव, राहुल जागडे, प्रमोद भारती, आणि विकास रेणोसे इ. सामाजिक कार्यकर्त्यांचीही महत्वाचे सहकार्य आणि उपस्थिती लाभली. उपस्थितांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमध्ये अधिकाधिक लोकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. अंकुर बाल आश्रमाच्या संचालिका हर्षदा भोसले यांनी संस्कृती संवर्धन फाउंडेशनने केलेल्या मदतीबद्दल विशेष आभार व्यक्त केले.तसेच फाउंडेशनचे अध्यक्ष अ‍ॅड.रणधीर सकपाळ यांनी संस्थेला मदत करणाऱ्या सर्व देणगीदार बंधू भगिनींचे फॉउंडेशनतर्फे आभार व्यक्त केले. संस्कृती संवर्धन फाउंडेशनच्या या स्तुत्य उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि विकासाची संधी मिळणार असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post