जीएसटी व रॉयल्टी कपातीमध्ये 15 कोटी चा भ्रष्टाचार - गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर दंडात्मक कारवाई करा - बाळू पाटील



गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर दंडात्मक कारवाई करा - बाळू पाटील 



किनवट : तालुक्यातील तांडा वस्ती योजनेमधील तात्कालिन गटविकास अधिकारी पि.जी. वैष्णव व ग्रामसेवक यांनी केलेल्या जि.एस.टी., रॉयल्टी व कपातीच्या रक्कमेतील 14 ते 15 कोटी रूपयाचा भ्रष्टाचार झाला असून सदर प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याबाबतचे निवेदन बाळू पवार दिग्रसकर यांनी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण आयुक्त कार्यालय, नांदेड यांना दिले.



 शासनाच्या ग्रामीण विकास विभागामार्फत राज्यस्तरीय तांडा वस्ती व जिल्हास्तरीय तांडा वस्तीचा ग्रामीण भागातील गावांना विकास निधी देण्यात आला आहे. दि. 01/02/2023 ते आजपर्यंत 50 कोटी रूपयाचा किनवट तालुक्यात विकास निधी तात्कालिन गटविकास अधिकारी पि.जी. वैष्णव व ग्रामसेवक यांच्या संयुक्त सहिच्या खात्यात निधी वर्ग आपल्या कार्यालयामार्फत ग्रा.प.च्या नावे असलेल्या खात्यावर करण्यात आला. ग्रामपंचायतीच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नावाने कार्यरंभ आदेश असतांना व गटविकस अधिकारी स्वतः स्थानिक स्वराज्य संस्था अध्यक्ष यांच्याशी करारनामा केलेला असतांना त्यांना तो विकास निधी स्थानिक स्वराज्य संस्थेला देणे बंदनकारक होते. परंतु  गटविकास अधिकारी पि.जी. वैष्णव व ग्रामसेवक यांनी निधी स्थानिक स्वराज्य संस्था अध्यक्ष, सरपंच यांच्या खात्यावर दिला नाही. तसेच स्वतः मा. गृटविकास अधिकारी पि.जी.वैष्णव व ग्रामसेवक यांनी बाहेरील व्यक्तीच्या नावे धनादेश वाटप केले. त्या व्यक्तीचा नावे कोठयावधी रूपयाचा धनादेश देण्यात आले त्या व्यक्तीचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकास कामाशी कुठलाही संबंध येत नाही. 'तसेच धनादेश वाटप करतांना त्यांनी जि.एस.टी. रॉयल्टी व इतर कपातीच्या रकमा कुठेही भरणा केलेल्या नाही. तसे बाळू उर्फ रामदास पवार यांनी अर्जासोबत पुरावे जोडले असल्याची माहिती दिली. गटविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी शासकिय कपातीच्या रकमा सहित उचल करून शासनाला तांडा वस्ती सुधार योजनेतून 14 ते 15 कोटी रूपयाचा चुना लावला असल्याचा आरोप केला.


सदर भ्रष्टाचार हे कसा झाला हे त्यांनी उदाहरणासह पुढीलप्रमाणे सांगितला आहे. (10 लक्ष रूपयाच्या कामाचे 1) जि.एस.टी । लक्ष 80 हजार रू. इतर कपात 60 हजार रू. 2) रॉयल्टी 30 हजार रू. एकुण 2 लक्ष 70 हजारा रू. प्रत्येकी 10 लक्ष रू. कामामागे भ्रष्ट्राचार केला आहे. तर 50 कोटी रूपयाचा 14 ते 15 कोटी रूपयाचा भ्रष्ट्राचार मा. गटविकास अधिकारी पि.जी. वैष्णव व ग्रामसेवकांनी मिळून केला आहे. 01/02/2023 पासुन आपण दिलेल्या किनवट तालुक्यातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय तांडा वस्ती विकास निधीच्या गटविकास अधिकारी व ग्रामसेवक संयुक्त खात्याचे चौकशी करून त्यांच्याकडुन शासनाचा 14 ते 15 कोटी रू. केलेला भ्रष्ट्राचाराचा निधी वसुल करावा व त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. 




अशी मागणी बाळू उर्फ रामदास बाळु पवार दिग्रसकर  यांनी निवेदनामध्ये केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post