खारपाणपट्ट्याच्या शास्वत विकासासाठी वेगळ्या उपाय योजनांची गरज..!डॉ-राजेंदर यादव

 


 विदर्भक्षारयुक्त जमीनीचे वा खारपाण जमीनीचे पंजाब हरीयाणा उत्तर प्रदेश गुजरात कुरुक्षेत्र व विदर्भ(महाराष्ट्र)मीळून ४/५ खारपान पट्टे असले तरी आमच्या पश्चिम विदर्भातील ३ जिल्हे १६ तालुके व सुमारे १००० गावांमिळुन बनलेला खारपाणपट्टा वेगळा आहे व त्याच्या समस्याही वेगळ्या आहेत-

 साहजिकच या समस्यांवरील उपाय योजनांची दिशाही वेगळी आखणे गरजेचे बनले आहे;असे प्रतिपादन राष्ट्रीय क्षार जमिन संस्था कर्नाल (हरीयाना)चे संचालक राजेंदर यादव यांनी खारपाणपट्टयाच्या दोन दिवशीय दौर्याच्या समाप्ती नंतर दर्यापुर तालुक्यातील रामागढ येथे केले आहे -

 खारपाणपट्ट्याची ही गरज लक्षात घेऊन केन्द्र सरकारने या पट्ट्यासाठी स्वतंत्र संशोधन केन्द्र निर्माण करुन त्याद्वारे त्या सोडवाव्यात अशी मागणी  

"श्रमराज्य परिषद" गत १२/१३ वर्षापासुन करीत आहे!

त्याला यश मिळाले असुन या अशा स्वतंत्र संशोधन केन्द्राची घोषणा केन्द्र सरकारने नुकतीच केली आहे!

यासाठी चे पहिलं पाऊल म्हणुन राष्ट्रीय क्षार जमीन संस्था कर्नाल (हरीयाणा)चे संचालक डॉ-राजेंदर कुमार यादव व डॉ-आर-एल-मीना तसेच

डॉ-पंजाबराव क्रुषि विद्यापीठ अकोला चे संशोधन संचालक डॉ-विलास खर्चे व सहाय्यक प्राध्यापक डॉ-बी-ए-सोनुने यांनी या भागाचा नुकताच दोन दिवसीय दौरा केला-

यात प्रामुख्याने दर्यापुर तालुक्यातील नरदोडा व रामागढ व अकोला तालुक्यातील म्हैसांग या गावांतील शेतकर्याशी या चमुने थेट संपर्क साधला.



श्रम राज्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद उर्फ बाबुजी नळकांडे व अमरावती जिल्हा "आत्मा" चे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे या दौऱ्यात पुर्ण वेळ सहभागी होतो-

अनेक प्रगतीशील व प्रयोगशील शेतकर्याकडुन या तध्न्य शास्त्रज्ञ चमुने या भागातील समस्या जाणुन घेतल्या-

विलास टाले,सुभाष लाजुरकर,विजय लाजुरकर यांच्या यशस्वी 

"कंटुर व शेततळे" प्रयोगाचे निरीक्षण थेट शेतात जाऊन निरीक्षण केले-

या दौर्यात विलास टाले,डॉ उत्तमराव सगणे,साहेबराव वाटाणे,कीशोर टाले,मंगेश बाभुळकर,नाना धाबे;सुभाष राजुरकर,गणेश लाजुरकर,संजय आसरेविजय लाजुरकर,शितल सिंग ठाकुर,श्रीक्रुष्ण उंबरकर,हर्षल टाले,अनिल तायडे; सुरेंद्र तायडे,विरेन्द्र‌ सिंह बघेले,विनोद लाजुरकर,प्रमोद लाजुरकर,रावसाहेब वडतकर,गजानन साबळे,प्रभुदास राजुरकर,सेवकराम राजुरकर,बाळा भाऊ काटकर,गजानन रामागडे,हरी प्रकाश राजुरकर,अक्षय राजुरकर,अशोक लाजरकर,सुधीर पवित्रकार,शांत रक्षक गवई,सुभाष टाले,गोपाल वसु यांची मनोगते ऐकुन घेतली- दौर्याच्या समारोपीय मेळाव्यात बाबुजी नळकांडे यांच्या विविध प्रकाशीत साहीत्य व छायाचित्रांच्या प्रदर्शनीचे उद् घाटन ही यादव यांनी केले- कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितलसिंग ठाकुर यांनी व आभार प्रदर्शन संजय आसरे यांनी केले.




Post a Comment

Previous Post Next Post