#गावाकडचीबातमी | गौरखेडा कुंभी येथे विजेचा लपंडाव


Mahavitaran

महावितरण विभागाचे दुर्लक्ष !!

जेष्ठ नागरिक व लहान मुलांना प्रचंड शारीरिक त्रास !!

  गावाकडची बातमी विशेष प्रतिनिधी / संतोष भालेराव 

अमरावती: अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गौरखेडा कुंभी येथे एक ते दीड महिन्यापासून घरगुती विज पुरवठा वारंवार खंडित होत आहे काही कारणं नसताना वारा वादळ नसताना पाऊस चालू नसताना सुद्धा विज पुरवठा खंडित झाल्याने गावातील जेष्ठ नागरिक व लहान मुलांना प्रचंड प्रमाणात उकाडा सहन करावा लागत आहे एक वेळ नैसर्गिक आपदा समजू शकतो परंतु काहीच कारण नसताना वीज पुरवठा खंडित होत असल्याने वीजपुरवठा जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचं जाणवतं आहे अशी चर्चा गावकरी करत आहेत.
अमरावती


   पाऊस येण्याची चाहूल लागताच विज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने सरपटणारे प्राणी लोकांच्या घरात घुसून नागरिकांना ईजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही अधिकारी तथा कर्मचारी गौरखेडा कुंभी गावाकडे दुर्लक्ष करत आहेत म्हणून गावातील नागरिक आता जिल्हा पातळीवरील अधिका- यांना वारंवार खंडित होणा- या विजेच्या त्रासाला कंटाळून निवेदन देण्यासाठी सरसावले आहेत असे गावातील काही नागरिकांनी सांगितले आहे त्यामुळे तालुका स्तरावरील अधिकारी आता काय पवित्रा घेतात हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


Tags: #महावितरण, #अभियंता #अचलपूर, #अमरावती #गावाकडचीबातमी, #गावसहेली, #शेतकरी #नागरिकत्रस्त, #विजेचालपंडाव, #गौरखेडाकुंभी,#वीजपुरवठा, #GaurkhedaKumbhi, #Achalpurnews,  #amaravati 


Post a Comment

Previous Post Next Post