चिरोडी जंगलात भीषण आग..!२०० एकर परिसर जळून खाक..!

 


  चांदूर रेल्वे वनक्षेत्रातील चिरोडी बीट वन विभाग ३११


 चिरोडी जंगलात भीषण आग, २०० एकर परिसर जळून खाक


अमरावती,चांदूर रेल्वे :  तालुक्यातील घनदाट चीरोडी जंगलात भीषण आग लागली असून जवळपास २०० एकराहून अधिक जंगल जळून खाक झाले आहे. या आगीत अनेक वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. वनविभागाच्या १५ जणांचा चमू आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, उशीर रात्रीपर्यंतही आगीवर नियंत्रण मिळवले गेलेले नाही.

    

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी घनदाट जंगलात अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.  

   दुपारी १२ वाजताच्या सुमारास ही आग लागली आणि संध्याकाळपर्यंत ती आणखीनच भडकत गेली. या आगीत जवळपास २०० एकराहून अधिक जंगल भस्मसात झाले आहे.  या जंगलात अनेक वन्यजीवांचा वास आहे, त्यामुळे आगीमुळे या प्राण्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.


भूरुडा पर्यटन स्थळालाही या आगीचा धोका निर्माण झाला असून, वनविभाग आणि स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. वनविभागाच्या तब्बल १५ कर्मचाऱ्यांचा चमू आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, सध्याच्या परिस्थितीत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलेले नाही. उशीर रात्रीपर्यंत आग धुमसतच होती.


     वनविभागाकडून आग लागण्यामागील कारणांचा शोध घेतला जात असून, ही आग नैसर्गिकरीत्या लागली की मानवी हलगर्जीपणामुळे लागली याबाबत चौकशी केली जात आहे. सध्या स्थानिक नागरिकांमध्ये या आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पुढील काही तासांत ही आग आटोक्यात आणता येईल का, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे.  


 चिरोडी जंगलातील भीषण आगीबाबतची सविस्तर माहिती. सध्या वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रशासन कोणती पावले उचलते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post