महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन जळगावला

 



भगवान चित्ते संमेलनाध्यक्ष उद्घाटक प्रा. डॉ. विष्णुकांत चटपल्ली


                 विदर्भ संपादक मिलिंद जामनिक 

     मूर्तिजापूर,ता.५ : महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे तृतीय साहित्य संमेलन शनिवारी (ता.८) जळगाव (खांदेश) च्या साईलिला सभागृहातील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत आयोजित करण्यात आले आहे.

    या एकदिवसीय साहित्य संमेलनात सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक विषयावर विचारमंथन होणार असून दोन परिसंवाद, एक कवी संमेलन आणि लोककलावंतांच्या कलाविष्काराचा यात समावेश आहे. नाभिक समाजात अनेक प्रतिभावंत साहित्यिक आणि कलावंत आहेत. त्यांना हक्काचे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने २०१९ मध्ये स्थापन झालेल्या महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघातर्फे प्रथम साहित्य संमेलन अमरावतीला ९ नोव्हेंबर २०१९ मध्ये व द्वितीय साहित्य संमेलन संतनगरी शेगावला ८ मार्च २०२२ ला झाले. रोजी अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झाले आहे. जळगाव या साहित्य नगरीत आयोजित तृतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लेखक तथा नाभिक मंच संपादक भगवान चित्ते (धुळे) असतील, तर या संमेलनाचे उद्घाटन बंगळुरूच्या गदग येथील कर्नाटक राज्य ग्रामीण विकास व पंचायत राज युनिव्हर्सिटी चे माजी कुलगुरू प्रा.डॉ.विष्णूकांत चटपल्ली करतील. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र नेरपगारे आसतील. असून प्रमुख अतिथी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष सयाजी झुंजार, छत्तासगड मधील वैशाली नगरचे आमदार रितेश सेन, मुंबईच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातील उपसचिव मनोज महाले उपस्थित रहातील.

----------------------------------------------------

                       दोन परिसंवाद 

 या साहित्य संमेलनात दोन परिसंवाद होतील. 'सकल नाभिक समाजाच्या उन्नतीसाठी उद्याच्या सामाजिक व राजकीय दिशा' या ज्येष्ठ पत्रकार गोपालकृष्ण मांडवकर यांच्या अध्यक्षतेखालील या परिसंवादात महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे, दत्ताजी अनारसे, भगवान बिडवे, रवि बेलपत्रे तसेच राष्ट्रीय नाभिक संघटना मुंबईचे अध्यक्ष अरुण जाधव, सकल नाभिक समाज माळशिरस (जिल्हा सोलापूर) येथील युवा नेतृत्व किरण भांगे सहभागी होतील.


       'नाभिक समाजातील महिलांचे सबलीकरण' या विषयावरील महिलांच्या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई वाघमारे असतील. माया नंदुरकर, हर्षदा निंबा बोरसे, अलका सोनवणे, पुनम महाले सहभागी होतील.

----------------------------------------------------

            कविसंमेलन आणि कलाविष्कार

 दुसऱ्या सत्रात नाभिक समाजातील लोककलावंतांच्या कलाविष्काराचा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर

महाराष्ट्रातील कवींचे कवी संमेलन होईल. सूत्रसंचालन पनवेलच्या सर्जनशील शब्दवेल साहित्य मंच चे अध्यक्ष प्रवीण बोपुलकर करतील.

---------------------------------------------------- स्मरणिका, पुस्तक प्रकाशन, सत्कार 

 उद्घाटन सत्रादरम्यान साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. तसेच अनेक साहित्यिकांच्या काव्यसंग्रहाचे आणि साहित्यकृतीचे प्रकाशान होईल.

----------------------------------------------------

या साहित्य संमेलनास नाभिक समाजातील साहित्य व कलाप्रेमींसह नाभिक समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र नाभिक साहित्य कलादर्पण संघाचे अध्यक्ष: शरद ढोबळे, उपाध्यक्ष मुकुंद धजेकर, गोपाळकृष्ण मांडवकर. कार्याध्यक्ष प्रा.अविनाश बेलाडकर, चंद्रशेखर जगताप, अनिल मल्लेलवार, प्रकाश नागपूरकर, सचिव: सुनीता वरणकर, कोषाध्यक्ष सतिश कान्हेरकर, कार्यकारिणी सदस्य संजय येऊलकर, राजेंद्र अमृतकर, शिवलिंग काटेकर, उमेश अलोणे, डॉ.किशोर बिडवे, प्रविण बोपुलकर, मानद संचालक संजय पवार, दत्तात्रय मोरे, अरुण सांगळे, मिलिंद नेरकर, राम पळसकर, गजानन मादेशवार, विशाल कान्हेरकर, आशिष घुमे, श्रीधर राजनकर, नीलेश राऊत, श्याम आस्करकर, कल्पना निंबोकर, अश्विनी अतकरे, अर्चना धानोरकर, प्रणिता राजूरकर, सुमनताई पवार, आशाताई दळवी, किरण पेठे, प्रीतम पवार, विजय दळवी, गोपाल कडूकर, राजेंद्र इंगळे, डॉ.हेमंत बाभूळकर, अरविंद धजेकर, गजेंद्र धजेकर, आप्पासाहेब खोंडे, दिनेश एकवनकर, मनोज बोरगावकर, नवनाथ घोडके, जिवन निंबाळकर, अजिंक्य इंगळे, शशिकांत वखरे, विकास वानखडे, मंगेश माळी, उदय टक्के, दत्ताराम कदम, प्रा.निवृत्ती पिस्तूलकर, दादासाहेब काळे, सुरेश बोरसे, संजय साळुंके, भालचंद्र गोरे, दिनेश महाले, दिनेश मोरे, सुदाम शिंदे, डॉ.महेश गायकवाड, राजेंद्र नगराळे, संजय वैद्य, शांताराम चव्हाण, संजय पंडित, रविंद्र नेरपगारे, गणेश वाळुंजकर, सयाजी झुंझार, प्रदीप पवार, राजेंद्र गणगे, मनोज कोरडे, पंकज भदाणे, माधुरी परपल्लीवार, प्रकाश पाटील, अशोक औटी, भारती सोनवणे, सुवर्णा वाघमारे, मंजुषा नांदूरकर आदींनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post